शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

अपघात टाळण्यासाठी विजेपासून सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:02 IST

पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : पावसाळ्यात विशेष खबरदारी घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यात विजेमुळे दुर्घटना होण्याच्या घटना अधिक घडतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजुचे फिडर पिल्लर, रोहित्राचे लोखंडी कुंपन, फ्युज बॉक्स तसेच घरात असलेली ओलसरे विद्युत उपकरणे, शेती पंपाचा स्वीच बोर्ड आदीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळी वारा यामुळे झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकला जातो. परिणामी वीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे, या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.शहरी व ग्रामीण भागात विजेची कोणतीही दुर्घटना घडल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही कंपनीच्या मोबाईलवरून तसेच लॅन्डलाईन क्रमांकावरून वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देता येणार आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र किंवा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. नागरिकांच्या हितासाठीच वीज पुरवठा खंडीत होतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.घरातील उपकरणे ओलाव्यापासून दूर ठेवापावसाळ्यात घरातील स्वीच बोर्ड किंवा विजेच्या उपकरणाचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खबरदारी घ्यावी. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास मे स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा. घरातील दूरचित्रवाहिणीचे डीश किंवा एन्टीना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्वीच बोडार्पासून सर्व बंद करावी. विशेषत: टिनपत्राच्या घरात राहणाºया नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. दुचाकी टेकवून ठेवू नये. विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळू घालू नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.