शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

राष्ट्रवादीमध्ये असल्याचा अभिमान बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:49 IST

महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु केलेली कर्जमाफी ही फसवी ठरली आहे. आघाडी सरकारच्या काळात सरसकट कर्जमाफी केली होती. या देशातील जनतेला खरे 'अच्छे दिन' मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे प्र्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लाखांदूर येथे कार्यकर्ता मेळावा, रक्तदान शिबिर, शेकडो तरुणांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : महाराष्ट्रासह देशभरातील नागरीक केंद्र सरकार व राज्य शासनाच्या खोटारडेपणापासून वैतागली आहे. सत्तेत येण्यापुर्वी दिलेले आश्वासने पोकळ ठरली आहेत. १५ लाख रुपये खात्यात जमा झाले नाहीत अन् रोजगारही मिळाला नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करुन सुरु केलेली कर्जमाफी ही फसवी ठरली आहे. आघाडी सरकारच्या काळात सरसकट कर्जमाफी केली होती. या देशातील जनतेला खरे 'अच्छे दिन' मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे प्र्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.लाखांदूर येथे गुरूवारला आशिर्वाद मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, विधानसभा अध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला आगाशे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती देविदास राऊत, नरेश दिवटे, नगरसेवक देवानंद नागदेवे, महिला अध्यक्षा कल्पना जाधव, शंकर खराबे, दिपक चिमनकर, रामचंद्र परशुरामकर आदी उपस्थित होते.खासदार पटेल म्हणाले, सध्याचे भाजप सरकार पळपुटे आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. महागाईने कंबरडे मोडलेली जनता आता पर्याय शोधत आहे. लोकसभेच्या पोटनिवडणूकी दरम्यान जाहीर करण्यात आलेले तुडतुड्याची रक्कम तिन महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही मिळाली नाहीत. त्यामुळे जनतेला भाजपला मतदान करायचे नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला पर्याय निर्माण करा. त्यासाठी मतदारांच्या घरा-घरापर्यंत पोहोचा.यावेळी खासदार मधुकर कुकडे म्हणाले, सन २०१४ मध्ये मोठी लाट आली. या लाटेत अनेकांना दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. गावातील ग्रामपंचायतच्या कार्यालयातही कधी न गेलेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलेला माणूस थेट देशाच्या संसदेत गेला. जनतेच्या मानसिकतेचा विचार करुन भाजपने खोटा प्रचार केला. त्यामुळे ही लाट निर्माण झाली होती. परंतु, आता लाट पुर्णपणे ओसरली आहे. यापुढे कोणतीही लाट येणार नाही. हवेवर, वातावरणावर निवडणूक होणार नाही. लाट ही केवळ एकदाच येते, सारखीच येत नाही. त्यामुळे भविष्य आपले आहे.दरम्यान उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील मार्गदर्शन केले. आयोजित कार्यकर्ता मेळावा व भव्य रक्तदान शिबिरात युवा कार्यकर्त्यांनी राँकात प्रवेश केला. रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ५० जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकॉ तालुकाध्यक्ष बालु चुन्ने यांनी केले. संचालन राकेश राऊत तर आभार प्रदर्शन आभार राकेश झोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी राँका युवक अध्यक्ष अ‍ॅड. मोहन राऊत, धनराज हटवार, चंद्रशेखर खेडीकर, शिलमंजू सिंहगडे, विनोद ढोरे, जितू सुखदेवे, साईनाथ रक्तपेढी नागपुरचे डॉ. अनिल ढोणे, डॉ. सतिश सोनवाने व चमू यांनी सहकार्य केले.