शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

नक्षलग्रस्त भत्त्याबाबत शिक्षकांशी सापत्न वागणूक

By admin | Updated: November 11, 2015 00:29 IST

शिक्षण विभागाने शिक्षकांवर सोपविलेली विद्यार्जनाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळीत आहेत. मात्र, त्यांना देय भत्त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

२००६ पासून शिक्षक वंचित : लाखांदूर, लाखनी तालुक्यातील ६५० शिक्षकांवर अन्यायभंडारा : शिक्षण विभागाने शिक्षकांवर सोपविलेली विद्यार्जनाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळीत आहेत. मात्र, त्यांना देय भत्त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिक्षकांना नक्षलग्रस्त विशेष भत्ता प्राप्त होत आहेत. परंतु, लाखांदूर व लाखनी तालुक्यातील सुमारे ६५० शिक्षकांसोबत २००६ पासून सापत्न वागणूक सुरू असून त्यांना नक्षल भत्त्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व लाखनी हे तीन तालुके नक्षलग्रस्त घोषीत करण्यात आलेले आहे. यामुळे या तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मुळ वेतनाच्या १५ टक्के किंवा १,५०० रूपये एवढा नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता लागू आहे. हा निर्णय सामान्य प्रशासन विभाग व शासन निर्णय आदिवासी विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार लागू करण्यात आला. यानुसार, ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार तिनही तालुक्यातील शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. अनुदेय देयबाबत शासनाच्या वित्त विभागाने ६ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कोणताही बदल केलेला नाही.२००६ पासून ६ वा वेतन आयोग लागू झाला. ही वाढ लागू झाली असली तरी जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने याचा लाभ केवळ साकोली तालुक्यातील शिक्षकांना देण्यात येत आहे. लाखांदूर व लाखनी तालुक्यातील शिक्षक या लाभापासून वंचित आहेत. याचा फटका लाखांदूर व लाखनी तालुक्यातील सुमारे ६५० शिक्षकांना फटका बसला आहे. साकोली तालुक्यातील शिक्षकांना दरवर्षी वेतन वाढीप्रमाणे नक्षल भत्त्यात वाढ करण्यात येत असून त्यानुसार वेतन सुध्दा देण्यात येत आहे. याचा लाभ लाखांदूर व लाखनी तालुक्यातील शिक्षकांना मिळत नसल्याने या शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सापत्न वागणुकीबद्दल नाराजी पसरली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य लेखाधिकारी केदार यांची भेट घेतली. यात शिक्षकांच्या नक्षलग्रस्त भत्त्यात होत असलेल्या तफावतीबाबत माहिती देण्यात आली. शिष्टमंडळात भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने, भैय्यालाल देशमुख, संजीव बावणकर, राकेश चिचाये, योगेश कुटे, देवानंद दुबे, संजय खंडाईत, विजय वाघाडे आदी उपस्थित होते. याबाबत मुख्य लेखाधिकारी केदार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)