शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

सावधान! न्यायालयाचा परस्पर येऊ शकतो समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:05 IST

दुचाकी चालविताना हेल्मेट घालत नसाल तर सावधान! तुम्हालाही परस्पर न्यायालयाचा समन्स येऊ शकतो. हेल्मेट न वापरणाऱ्या स्वारांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून न्यायालयात केस दाखल करण्याचा सपाटा पोलीस दलाने लावला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालाच अन्यथा तुम्हालाही न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागू शकते.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : दुचाकीचा क्रमांक नोंदवून करणार केस दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकी चालविताना हेल्मेट घालत नसाल तर सावधान! तुम्हालाही परस्पर न्यायालयाचा समन्स येऊ शकतो. हेल्मेट न वापरणाऱ्या स्वारांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून न्यायालयात केस दाखल करण्याचा सपाटा पोलीस दलाने लावला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालाच अन्यथा तुम्हालाही न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागू शकते.सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सक्ती करण्यात आली आहे. सुरूवातीला चौकाचौकात पोलिसांनी दुचाकीस्वारांवर कारवाईचा सपाटा लावला. मात्र अलिकडच्या काळात पोलीस कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे विना हेल्मेटची दुचाकी चालविताना दिसतात. मात्र पोलिसांचा डोळा तुमच्यावर आहे. हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना वाहतूक पोलीस काहीही बोलणार नाही. मात्र त्यांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून घेतील. त्यानंतर आरटीओकडून त्याचा तपशील घेवून दुचाकीस्वाराविरूद्ध थेट न्यायालयात केस दाखल करतील. भंडारा शहरात या प्रकाराला सुरूवात झाली आहे.पोलिसांनी ही परस्पर कारवाई करण्याचा निर्णय नागरिकांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी घेतला आहे. हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध पोलीस कारवाई करण्यास गेले की त्यांच्यावर दबाव आणला जातो. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी हेल्मेट सक्तीविरोधात आवाज उठविला आहे. प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती शिथिल झाल्याचा गैरसमज नागरिकात निर्माण झाला. मात्र नागरिकांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी आता पोलिसांनी परस्पर प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गत आठवडाभरापासून वाहतूक नियंत्रण शाखेच्या मोबाईल व्हॅनद्वारे ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना याबाबतची माहिती दिली जात आहे. तसेच हेल्मेट वापरण्याची सुचनाही केली जात आहे.नगरपरिषद क्षेत्रातही हेल्मेट सक्तीमहाराष्ट्र शासनाने २० आॅगस्ट २००३ रोजी अधिसूचना काढून महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्र हेल्मेट सक्तीतून वगळले होते. मात्र त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २००५ रोजी पुन्हा अधिसुचना जारी केली. त्यानुसार राज्यात त्या सर्वच क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. परिणामी भंडारा शहरातही हेल्मेट सक्ती असून यात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे यांनी कळविले आहे.१३८५ दुचाकीस्वारांवर कारवाईभंडारा जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू झाली तेव्हापासून एक हजार ३८५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख ९२ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले आहे.