शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

सावधान! न्यायालयाचा परस्पर येऊ शकतो समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:05 IST

दुचाकी चालविताना हेल्मेट घालत नसाल तर सावधान! तुम्हालाही परस्पर न्यायालयाचा समन्स येऊ शकतो. हेल्मेट न वापरणाऱ्या स्वारांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून न्यायालयात केस दाखल करण्याचा सपाटा पोलीस दलाने लावला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालाच अन्यथा तुम्हालाही न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागू शकते.

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : दुचाकीचा क्रमांक नोंदवून करणार केस दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकी चालविताना हेल्मेट घालत नसाल तर सावधान! तुम्हालाही परस्पर न्यायालयाचा समन्स येऊ शकतो. हेल्मेट न वापरणाऱ्या स्वारांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून न्यायालयात केस दाखल करण्याचा सपाटा पोलीस दलाने लावला आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालाच अन्यथा तुम्हालाही न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागू शकते.सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सक्ती करण्यात आली आहे. सुरूवातीला चौकाचौकात पोलिसांनी दुचाकीस्वारांवर कारवाईचा सपाटा लावला. मात्र अलिकडच्या काळात पोलीस कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे विना हेल्मेटची दुचाकी चालविताना दिसतात. मात्र पोलिसांचा डोळा तुमच्यावर आहे. हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना वाहतूक पोलीस काहीही बोलणार नाही. मात्र त्यांच्या दुचाकीचा परस्पर क्रमांक नोंदवून घेतील. त्यानंतर आरटीओकडून त्याचा तपशील घेवून दुचाकीस्वाराविरूद्ध थेट न्यायालयात केस दाखल करतील. भंडारा शहरात या प्रकाराला सुरूवात झाली आहे.पोलिसांनी ही परस्पर कारवाई करण्याचा निर्णय नागरिकांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी घेतला आहे. हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध पोलीस कारवाई करण्यास गेले की त्यांच्यावर दबाव आणला जातो. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी हेल्मेट सक्तीविरोधात आवाज उठविला आहे. प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती शिथिल झाल्याचा गैरसमज नागरिकात निर्माण झाला. मात्र नागरिकांसोबत होणारा संघर्ष टाळण्यासाठी आता पोलिसांनी परस्पर प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गत आठवडाभरापासून वाहतूक नियंत्रण शाखेच्या मोबाईल व्हॅनद्वारे ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना याबाबतची माहिती दिली जात आहे. तसेच हेल्मेट वापरण्याची सुचनाही केली जात आहे.नगरपरिषद क्षेत्रातही हेल्मेट सक्तीमहाराष्ट्र शासनाने २० आॅगस्ट २००३ रोजी अधिसूचना काढून महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्र हेल्मेट सक्तीतून वगळले होते. मात्र त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २००५ रोजी पुन्हा अधिसुचना जारी केली. त्यानुसार राज्यात त्या सर्वच क्षेत्रामध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. परिणामी भंडारा शहरातही हेल्मेट सक्ती असून यात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे यांनी कळविले आहे.१३८५ दुचाकीस्वारांवर कारवाईभंडारा जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू झाली तेव्हापासून एक हजार ३८५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख ९२ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले आहे.