शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सावधान! कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाची धावपळ होताना दिसत आहे.

ठळक मुद्देगणखैरा परिसरातील गावे झाली सील : तालुक्यात भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ५७ दिवस ‘लाकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करणाऱ्या तालुकावासीयांना ‘लॉकडाऊन’ शिथिल होताच अवघ्या ८ दिवसांत धक्का बसला. तालुक्यातील ग्राम गणखैरा व आबेंतलाव येथे कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने परिसरातील गावे सील करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (दि.२३) तालुक्यात ३ कोरोनाग्रस्त रूग्ण मिळाल्याने सर्वच दहशतीत असून रस्त्यांवर कमालीची शांतता बघायला मिळत आहे.परराज्य व जिल्ह्यातून नागरीक आपल्या गावी पोहोचत आहेत. पण शहरी व ग्रामीण भागातील निगरगट्ट प्रशासनाने बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे कोरोनाच्या रूग्णांत वाढ होताना दिसत आहे. जिल्हासह तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनाची धावपळ होताना दिसत आहे. गावखेड्यात बाहेरून घर वापसी झालेल्या मजुरांमुळे आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.तालुक्यात २५ मार्चपासून आतापर्यंत सहा हजार १९१ नागरिकांनी घर वापसी केली आहे. यातील बºयाच लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर अनेक जण अजूनही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहे.स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोरोना वाढीस अनुकुल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. ८ दिवसांपूर्वी पुणे वरून आलेला मजूर घरी आला याविषयी नगर पंचायतला कळविण्यात आले.पण नगर पंचायतचे जबाबदार कर्मचारी साधा फोन उचलण्याचीही तसदी घेत नाही.यावरून येथील नगर पंचायत कोरोना बाबतीत उदासीन असल्याचे दिसते. नगर पंचायत हद्दीत कोरोना विषयक अपडेट देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे.पण इथे सर्व टोलवाटोलविची कामे सुरू आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याची जबाबदारी नगर पंचायतची आहे. पण नगर पंचायत स्वत: काहीच करीत नाही आणि कुणी माहिती दिली तर त्याकडेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे.गणखैरा येथे अत्यावश्यक सेवाही बंदतालुक्यातील ग्राम गणखैरा येथे कोरोनाचा रूग्ण मिळाल्याने रस्त्यावर कमालीची शांतता आहे. सोबतच किराणा दुकानही बंद ठेवण्यात आले आहे. गणखैरात चारही बाजूने कडकडीत बंद असून फक्त अतिमहत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना सोडले जात आहे. तर सोबतच ग्राम आंबेतलाव येथे शनिवारी १ रूग्ण मिळाल्याने तेथील १६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. गावात पोलीस चौकी तयार करण्यात आली असून गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. किराणा दुकानापासून सर्व काही बंद करण्यात आले असल्याची माहिती सरपंच योगेश चौधरी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

राबणारे राबतात, बाकीचे नॉटरिचेबलनगर पंचायतच्या सुस्त धोरणामुळे कोरोना वाढीस वाव मिळत आहे असा आरोप नागरीक करीत आहे. मात्र ग्रामपंचायत कोरोना बाबतीत एक पाऊल पुढे आहेत. गावखेड्यात शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. सध्या शहरात आशा वर्कर आणि एक तलाठी जी.व्ही.गाढवे राबताना दिसत आहेत. २-४ नगरसेवक सोडले तर उर्वरितांचा पत्ता नाही. सुरूवातीला महादान करणारे नगरसेवक गायब झाले आहे. आशा सेविका घरोघरी जाऊन बाहेरून आलेल्यांची माहीती गोळा करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या