शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सावधान ! उघड्यावर शौचास बसाल तर कारवाई

By admin | Updated: January 18, 2017 00:24 IST

शौचालयाचे बांधकाम न करता उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश : पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रामस्तरावर होणार अंमलबजावणीभंडारा : शौचालयाचे बांधकाम न करता उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. अशी कृती करून अनेकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांना आता वेळीच सावधान होण्याचा प्रसंग आला आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांविरुद्ध आता फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अन्वये पोलीस कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांविरुद्ध यापुढे कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांनी दिले आहे. याबाबत जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी या सातही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रामस्तरावर तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना यात दिलेल्या आहेत.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत राज्यभर लाभार्थ्यांना वैयक्तिकस्तरावर स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्हा सन २०१६-१७ वर्षात हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार वार्षिक कृती आराखड्यामध्ये ४३२ ग्रामपंचायती समाविष्ट करून २०१२ च्या पायाभूत सर्व्हेक्षणानुसार ५९,५०१ वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट्ये निर्धारित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सुमारे ४० हजार शौचालयाचे बांधकाम भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये पूर्णत्वास आले आहे. उर्वरीत सुमारे २० हजार शौचालयाचे बांधकाम होणे आहे. राज्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीकोणातून व गावे हागणदारीमुक्त करण्याच्या राज्यस्तर ते ग्रामपंचायतस्तरापर्यंत ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता व अन्य विभागाची यंत्रणा कृतीशिल झाली असून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तरीही बहुतांश गावातील कुटुंब शौचालयाचे बांधकाम करून त्यामध्ये शौचास जात नाहीत तर काही कुटुंब शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेची सुविधा उपलब्ध झाल्यानंतरही अनेक कुटुंब शौचास उघड्यावर जात असल्याने अन्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अन्वये उघड्यावर शौचास बसणे, सार्वजनिक जागेवर सांडपाणी सोडणे, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल अशी कुठलीही कृती करण्यास मज्जाव करण्यात आलेला असून या मध्ये रुपये १२०० पर्यंत दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाने शौचालयाचा वापर करणे गरजेचे असून यामुळे गावातील उघड्यावरील हागणदारीचे समुळ उच्चाटण होऊन गाव स्वच्छ सुंदर व कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ग्रामस्तरावर शौचालयाचे बांधकाम, वापर व स्वच्छता ठेवण्यासाठी जनजागृती केल्या जात असताना काही नागरिक जाणीवपूर्वक उघड्यावर शौचास जात आहेत. तर अनेक कुटुंब शौचालयाचे बांधकाम करण्यास उदासीन दिसून येत आहेत.उघड्यावरील हागणदारीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी शासन परिपत्रकाच्या संदर्भानुसार मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील ११५ व ११७ कलमान्वये ग्रामस्तरावर कार्यवाही करावी असे निर्देश दिलेले आहेत. याबाबत पंचायत समितीस्तरावर खंड विकास अधिकारी पंचायत समिती सर्व यांना पत्रव्यवहार करून उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी कठोर पाऊले उचलली आहे. ग्रामस्तरावर उघड्यावर हागणदारीला जाणाऱ्या नागरिकांनी वेळीच शौचालयाचे बांधकाम करून वापर करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. घरी शौचालय असूनही उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांनी वेळीच सावधान होण्याची पाळी आली आहे. (शहर प्रतिनिधी)