शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

ओबीसींच्या हक्कासाठी जागृत व्हावे

By admin | Updated: December 19, 2015 00:34 IST

संविधानातील घटनेच्या कलम ३४० नुसार ओबींसीना लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत ५२ टक्के आरक्षण मिळायला हवे,

जिल्हा अधिवेशन : संजय वाणे यांचे प्रतिपादनसाकोली : संविधानातील घटनेच्या कलम ३४० नुसार ओबींसीना लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत ५२ टक्के आरक्षण मिळायला हवे, ओबीसींना घटनेने दिलेले हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी या समाजातील बुध्दीजीवी वर्गाने जागरुक व्हावे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून चळवळ उभी करण्याची जबाबदारी बुध्दीजीवी वर्गावर आहे. त्याशिवाय ओबीसींचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होणार नाही, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय वाणे यांनी केले.साकोली येथे नंदलाल पाटील कापगते विद्यालय ओबीसी जनगणना परिषद व जिल्हा अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डी.ए. दळवी, डॉ. महेंद्र धावळे, भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, निश्चय दोनोडकर, जयंत झोडे, अमित गायधनी, सावंत कटरे, आर.टी. तरोणे, प्रदीप गोमासे, डॉ. अतुल दोनोडे उपस्थित होते. यावेळी डी.ए. दळवी म्हणाले, ओबीसी समाज चाली, रुढी, पूजाअर्चनेत गुंतला आहे. समाजाला जागृत करण्याचे काम सरकारी अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांना करायचे आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी जागृत करण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)