शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बावनथडी कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे.

ठळक मुद्देखापा-काटेबाम्हणी येथील प्रकार : बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. त्यामुळे येथील कालवा बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या कालव्यातून वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाने कालव्यातील माती वाहून जात कालवा फुटण्याच्या भीती बळावली आहे.तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे. तुमसर -मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्प दिवास्वप्न ठरु पाहणाऱ्या प्रकल्पात यंदा पाहीजे तेवढा पाण्याचा मुबलक शिल्लक साठा उपलब्ध नाही. पावसाच्या लपंडावामुळे मात्र सध्याच्या घडीला तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पीक रोवणीसाठी कालव्यामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.गत काही वर्षापूर्वीपासून तयार करण्यात आलेल्या खापा-काटेबाम्हणी शिवारातील सिमेंटच्या मुख्य कालव्याला भगदाड पडले असल्याने कालव्यातील माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जात कालवा फुटण्याची शक्यता येथे बळावली आहे. तर येथील हजारो शेतकऱ्यांच्या शेतपीकाची व कालव्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याकडे मात्र संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची फाळणी करीत टाकलेल्या बावनथडी कालव्याचे व वितरीकेचे बांधकाम मात्र अद्याप अपूर्णच असले तरी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कालव्याद्वारे गत चार ते पाच वर्षापासून पाणी सोडण्यात येत आहे.त्या धर्तीवर येथील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोबदल्यात पाणी कर शेतकऱ्यांकडून नियमीत वसूल करण्यात येते. येथे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे शाखा अभियंता व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून मात्र अद्याप पाणी वाटपासंबधी ध्येयधोरण ठरविण्यात आले नाही. प्रकल्पबाधित बहुतांश गावात गावनिहाय सुध्दा पाणी वाटप समिती तयार करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतजमीनीपर्यत कालव्या द्वारे समितीच्या ध्येयधोरणानुसार पाणी पोहचविण्याची जबाबादारी आहे. मात्र त्या समिती सदस्यांकडून पाणी वाटपच करण्यात येत नसल्याचा प्रकार सुध्दा समोर आला आहे. कालव्याद्वारे देण्यात येणाºया पाण्याचे योग्य नियोजन करीत व अपव्यय टाळत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर टेलपर्यंत पहिल्यांदा पाणी पोहचवणे गरजेचे असताना येथे नजीकच्या शेतकºयांना प्रथम पाणी पुरवठा होत आहे. यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो शेतकºयांना बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेमुळे धान रोवणीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.कालव्याची वेळीच दुरूस्ती गरजेचीप्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. या समस्येकडे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून कालव्याची वेळीच दुरूस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा येथील कालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तवली जात आहे. अन्यथा साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होऊ नये, ही अपेक्षा.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प