शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बावनथडी कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे.

ठळक मुद्देखापा-काटेबाम्हणी येथील प्रकार : बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. त्यामुळे येथील कालवा बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या कालव्यातून वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाने कालव्यातील माती वाहून जात कालवा फुटण्याच्या भीती बळावली आहे.तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करू पाहण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाने गत ३५ वर्षापुर्वी बावनथडी नदीच्या मधोमध बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाचा पाया रोवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप तालुक्यात समाधानकारक पाऊसच पडला नाही परिणामी शेतकऱ्यांना धान पीक वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे. तुमसर -मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना बावनथडी प्रकल्प दिवास्वप्न ठरु पाहणाऱ्या प्रकल्पात यंदा पाहीजे तेवढा पाण्याचा मुबलक शिल्लक साठा उपलब्ध नाही. पावसाच्या लपंडावामुळे मात्र सध्याच्या घडीला तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पीक रोवणीसाठी कालव्यामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.गत काही वर्षापूर्वीपासून तयार करण्यात आलेल्या खापा-काटेबाम्हणी शिवारातील सिमेंटच्या मुख्य कालव्याला भगदाड पडले असल्याने कालव्यातील माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जात कालवा फुटण्याची शक्यता येथे बळावली आहे. तर येथील हजारो शेतकऱ्यांच्या शेतपीकाची व कालव्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याकडे मात्र संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची फाळणी करीत टाकलेल्या बावनथडी कालव्याचे व वितरीकेचे बांधकाम मात्र अद्याप अपूर्णच असले तरी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कालव्याद्वारे गत चार ते पाच वर्षापासून पाणी सोडण्यात येत आहे.त्या धर्तीवर येथील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोबदल्यात पाणी कर शेतकऱ्यांकडून नियमीत वसूल करण्यात येते. येथे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे शाखा अभियंता व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून मात्र अद्याप पाणी वाटपासंबधी ध्येयधोरण ठरविण्यात आले नाही. प्रकल्पबाधित बहुतांश गावात गावनिहाय सुध्दा पाणी वाटप समिती तयार करण्यात आली असली तरी त्यांच्याकडून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतजमीनीपर्यत कालव्या द्वारे समितीच्या ध्येयधोरणानुसार पाणी पोहचविण्याची जबाबादारी आहे. मात्र त्या समिती सदस्यांकडून पाणी वाटपच करण्यात येत नसल्याचा प्रकार सुध्दा समोर आला आहे. कालव्याद्वारे देण्यात येणाºया पाण्याचे योग्य नियोजन करीत व अपव्यय टाळत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर टेलपर्यंत पहिल्यांदा पाणी पोहचवणे गरजेचे असताना येथे नजीकच्या शेतकºयांना प्रथम पाणी पुरवठा होत आहे. यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हजारो शेतकºयांना बावनथडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेमुळे धान रोवणीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.कालव्याची वेळीच दुरूस्ती गरजेचीप्रकल्पाच्या मुख्य सिमेंट कालव्याला खापा-काटेबाम्हणी शेतशिवारात भगदाड पडले आहे. या समस्येकडे संबंधित बावनथडी प्रकल्पाचे व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून कालव्याची वेळीच दुरूस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा येथील कालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तवली जात आहे. अन्यथा साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होऊ नये, ही अपेक्षा.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प