शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

प्राचीन राजस्थानी बावडी व मंदिर मोजते शेवटची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST

तुमसर : राजस्थानी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली १५० वर्षांपूर्वीची तालुक्यातील गोबरवाही येथील बावडी (विहीर) आणि मंदिर शेवटच्या घटका मोजत ...

तुमसर : राजस्थानी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली १५० वर्षांपूर्वीची तालुक्यातील गोबरवाही येथील बावडी (विहीर) आणि मंदिर शेवटच्या घटका मोजत आहे. मंदिराच्या छताला गळती लागली असून, प्राचीन वारसा जतन करण्यासाठी स्थानिक विकास निधी अथवा पर्यटन विकास निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

गोबरवाही येथे दानशूर सेठ गोवर्धनलाल अग्रवाल यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी मंदिर व बावडीची निर्मिती केली होती. राजस्थानी पद्धतीने बांधलेली बावडी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. येथील बावडीचे पाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांसह ग्रामस्थांची तहान भागवित होती. मंदिराचे बांधकाम करणारे सेठ गोवर्धनलाल यांचे वंशज शहरात वास्तव्याला आहेत. कालांतराने गावात विहीर व कूपनलिका बांधकाम केल्याने बावडीच्या पाण्याचा वापर कमी झाला. त्यामुळे विहिरीच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले.

२०१८ मध्ये येथे आमदार निधीतून समाज भवनाचे बांधकाम करण्यात आले. समाज भवनाच्या छताचा उतार येथील हनुमान मंदिराच्या दिशेने करण्यात आला बांधकामात तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे पावसाळ्यात समाजमंदिराच्या छतावरील संपूर्ण पाणी हनुमान मंदिराच्या छतावर पडतो. मंदिराचे बांधकाम प्राचीन असल्याने मंदिराच्या छताला गळती लागली. त्यामुळे मंदिर परिसरात सतत ओलावा राहतो.

आता मंदिर दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली विहीर जतन करण्याची गरज आहे. स्थानिक रहिवासी पुरुषोत्तम मिश्रा, ललित तिवारी, भुवनेश्वर देशकर, अरविंद वाकीकर या सर्व गावातील नागरिक मंदिर परिसराची देखभाल करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहेत. स्थानिक विकास अथवा पर्यटन विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्यास बावडी व प्राचीन मंदिराला गतवैभव मिळेल.

बॉक्स

पायऱ्यांची विहीर म्हणजे बावडी

बावडी एक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असते. पायऱ्यांनी तयार केलेली विहीर म्हणजे बावडी. देशातील विविध भागत बावडी तयार करण्यात आल्या होत्या. त्याचा मुख्य उद्देश स्नान करण्यासाठी, धार्मिक विधीसाठी बावड्या तयार केल्या जात होत्या. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात त्या काळी या बावड्याची निर्मिती दानशूरांनी केल्या. मात्र आता त्याकडे दर्लक्ष होत आहे.