शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 20:13 IST

Bhandara News मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे.

भंडारा : सतत आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सिहोरा परिसरातील नाले तुडुंब भरले आहेत. मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. वाहतूक बंद करण्याचे सूचना देण्यात आल्या नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

अवकाळी पावसाने संततधारपणे हजेरी लावली आहे. सिहोरा परिसरात धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात असणाऱ्या वैनगंगा आणि बावणथडी बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. वैनगंगा नदीवरील धरणात पाणी अडविण्यात आले आहेत. या पाण्याची थोप बपेरा गावापर्यंत आहे. या गावांचे शेजारी दोन नद्यांचा संगम आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे पर्यंत बावणथडी नदीचे पात्र कोरडे राहते.

नदीच्या काठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी देण्यासाठी या चार महिन्यांत राजीव सागर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. परंतु यंदा नदीच्या पात्राचे पूर्णतः चित्र बदलले आहे. आजवर कधी मे महिन्यात बावणथडी नदीला पूर आला नव्हता. परंतु मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. भर उन्हाळ्यात नदीला आलेला पूर पाहून काठावरील गावकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करीत आहेत. नदीला पूर आल्यानंतर वाहनांची ये-जा बंद करण्यात आलेली नाही. नदीला पूर आल्यानंतर सोंड्याटोला प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. परंतु पंपगृह ऑपरेटरचे वेतन थकले असल्याने नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद केला आहे.

बावणथडी नदीला पूर आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावरून पुराचे पाणी ओवरफ्लो झाले आहे. धरणाचे उधर्व भागात नदीचे पात्र कोरडे आहे. ओवरफ्लो पाण्याची गती वाढल्यास उधर्व भाग पुराचे पाण्याने समतल होणार आहे. बावणथडी नदीवरील धरणाचे उधर्व भागाचे पात्रातील मध्य प्रदेशातील सरकारने हद्दीतील रेती घाट लिलावात काढले आहे. नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात केले जात आहेत. धरणावरून पाणी ओवरफ्लो झाले असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात येणार आहे.

टॅग्स :floodपूर