शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 20:13 IST

Bhandara News मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे.

भंडारा : सतत आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सिहोरा परिसरातील नाले तुडुंब भरले आहेत. मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. वाहतूक बंद करण्याचे सूचना देण्यात आल्या नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

अवकाळी पावसाने संततधारपणे हजेरी लावली आहे. सिहोरा परिसरात धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात असणाऱ्या वैनगंगा आणि बावणथडी बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. वैनगंगा नदीवरील धरणात पाणी अडविण्यात आले आहेत. या पाण्याची थोप बपेरा गावापर्यंत आहे. या गावांचे शेजारी दोन नद्यांचा संगम आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे पर्यंत बावणथडी नदीचे पात्र कोरडे राहते.

नदीच्या काठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी देण्यासाठी या चार महिन्यांत राजीव सागर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. परंतु यंदा नदीच्या पात्राचे पूर्णतः चित्र बदलले आहे. आजवर कधी मे महिन्यात बावणथडी नदीला पूर आला नव्हता. परंतु मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. भर उन्हाळ्यात नदीला आलेला पूर पाहून काठावरील गावकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करीत आहेत. नदीला पूर आल्यानंतर वाहनांची ये-जा बंद करण्यात आलेली नाही. नदीला पूर आल्यानंतर सोंड्याटोला प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. परंतु पंपगृह ऑपरेटरचे वेतन थकले असल्याने नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद केला आहे.

बावणथडी नदीला पूर आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावरून पुराचे पाणी ओवरफ्लो झाले आहे. धरणाचे उधर्व भागात नदीचे पात्र कोरडे आहे. ओवरफ्लो पाण्याची गती वाढल्यास उधर्व भाग पुराचे पाण्याने समतल होणार आहे. बावणथडी नदीवरील धरणाचे उधर्व भागाचे पात्रातील मध्य प्रदेशातील सरकारने हद्दीतील रेती घाट लिलावात काढले आहे. नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात केले जात आहेत. धरणावरून पाणी ओवरफ्लो झाले असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात येणार आहे.

टॅग्स :floodपूर