शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भर उन्हाळ्यात बावणथडी नदीला आला पूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 20:13 IST

Bhandara News मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे.

भंडारा : सतत आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सिहोरा परिसरातील नाले तुडुंब भरले आहेत. मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. वाहतूक बंद करण्याचे सूचना देण्यात आल्या नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

अवकाळी पावसाने संततधारपणे हजेरी लावली आहे. सिहोरा परिसरात धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात असणाऱ्या वैनगंगा आणि बावणथडी बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. वैनगंगा नदीवरील धरणात पाणी अडविण्यात आले आहेत. या पाण्याची थोप बपेरा गावापर्यंत आहे. या गावांचे शेजारी दोन नद्यांचा संगम आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे पर्यंत बावणथडी नदीचे पात्र कोरडे राहते.

नदीच्या काठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी देण्यासाठी या चार महिन्यांत राजीव सागर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जाते. परंतु यंदा नदीच्या पात्राचे पूर्णतः चित्र बदलले आहे. आजवर कधी मे महिन्यात बावणथडी नदीला पूर आला नव्हता. परंतु मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. भर उन्हाळ्यात नदीला आलेला पूर पाहून काठावरील गावकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करीत आहेत. नदीला पूर आल्यानंतर वाहनांची ये-जा बंद करण्यात आलेली नाही. नदीला पूर आल्यानंतर सोंड्याटोला प्रकल्पातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. परंतु पंपगृह ऑपरेटरचे वेतन थकले असल्याने नदी पात्रातून पाण्याचा उपसा बंद केला आहे.

बावणथडी नदीला पूर आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावरून पुराचे पाणी ओवरफ्लो झाले आहे. धरणाचे उधर्व भागात नदीचे पात्र कोरडे आहे. ओवरफ्लो पाण्याची गती वाढल्यास उधर्व भाग पुराचे पाण्याने समतल होणार आहे. बावणथडी नदीवरील धरणाचे उधर्व भागाचे पात्रातील मध्य प्रदेशातील सरकारने हद्दीतील रेती घाट लिलावात काढले आहे. नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात केले जात आहेत. धरणावरून पाणी ओवरफ्लो झाले असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात येणार आहे.

टॅग्स :floodपूर