शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

-तर बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:56 IST

बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले.

ठळक मुद्देकमकासूरवासीयांचा इशारा : चार दिवस लोटूनही कारवाई शून्य, आदिवासी बांधवांचे जगणे कठीण

राहुल भुतांगे/मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसनस्थळी कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात न आल्यामुळे आदिवासी बांधव पुनर्वसित गाव सोडून कमकासुर या स्वगावी परतले आहेत. आता या घटनेला चार दिवस लोटूनही प्रशासनाने या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ‘सरकारता पाई ते आत्मा भडके मात’ असे म्हणत समस्येवर दोन दिवसात तोडगा न निघाल्यास आम्ही २४५ आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाºया बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या गळभरणी करतेवेळी कमकासूर या गावातील आदिवासी कुटुंबांना बंदुकीच्या धाकावर गावाबाहेर काढून सन २०११-१२ मध्ये रामपूर या गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसित गावात १८ नागरी मुलभूत सुविधांचा वाणवा आहे. घर नाही, वीज नाही, पाणी नाही आणि धड रस्तेही नाही, उपजिविकेचे असलेली शेती हिरावल्या गेल्याने उपासमारीचे संकट ओढवले आहे. सन २००६ मध्ये जमिन अधिग्रहण करून जमिनीचा अवार्ड करण्यात आला. मात्र स्थलांतरण सन २०१२ मध्ये झाल्याने सन २०१२ प्रमाणे जमिनीची किंमत देण्यात यावी, कायद्यानुसार आदिवासींना पट्टे मिळावे याकरिता आदिवासी यांचा लढा सुरूच होता.दरम्यान मुलभूत सुविधा मिळणे बंद झाल्याने मूळगावी असलेल्या शेतीवर उदरनिर्वाह करता येईल, यासाठी पुनर्वसित गाव सोडून मूळ गावी परतले. चार दिवस लोटले तरी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही. त्यामुळे या आदिवसी बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान ८ आॅक्टोबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश राहांगडाले, अशोक उईके, अनिल टेकाम, लक्ष्मीकांत सलामे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी कमकासुर येथे भेट दिली असता आदिवासींच्या वास्तव जिवनाचे चित्र समोर आले. कमकासूर येथे प्रकल्पग्रस्तांची घरे पडलेली आहेत. तिथे तात्पुरते शेड असून अंधाराच्या काळोख्यात वन्यप्राण्यांच्या सावटात, हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे जगणे सुरू आहे. या जगण्याला वैतागलेल्या कचरू नेताम या आदिवासी बांधवाने सर्वांसमोर बावनथडी प्रकल्पातच उडी घेतली. मात्र प्रसंगावधानाने त्याला बाहेर काढून त्याची समजूत काढण्यात आली. आता आणखी किती दिवस वाट पाहावे, असे म्हणत दोन दिवसात तोडगा न निघाल्यास कमकासुर येथील २४५ ही आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असा इशारा त्यांनी दिला आहे.जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत मागे वळून पाहायचे नाही. सर्व प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेणार आहे.- किशोर उईके, सरपंच कमकासुर.प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय खपवून घेणार नाही. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता निवदने पाठविली आहेत. वेळप्रसंगी आदिवासीकरिता रस्त्यावरही उतरण्याची तयारी आहे.- राजेंद्र पटले, जिल्हाप्रमुख शिवसेना.रामपूर व गर्रा बघेडा पुनर्वसनस्थळावर मुलभूत सुविधांची माहिती घेण्यात आली. उपजिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आढावा घेऊन समस्या निकाली काढण्यात येईल.- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.