शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

-तर बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:56 IST

बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले.

ठळक मुद्देकमकासूरवासीयांचा इशारा : चार दिवस लोटूनही कारवाई शून्य, आदिवासी बांधवांचे जगणे कठीण

राहुल भुतांगे/मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसनस्थळी कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात न आल्यामुळे आदिवासी बांधव पुनर्वसित गाव सोडून कमकासुर या स्वगावी परतले आहेत. आता या घटनेला चार दिवस लोटूनही प्रशासनाने या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ‘सरकारता पाई ते आत्मा भडके मात’ असे म्हणत समस्येवर दोन दिवसात तोडगा न निघाल्यास आम्ही २४५ आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाºया बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या गळभरणी करतेवेळी कमकासूर या गावातील आदिवासी कुटुंबांना बंदुकीच्या धाकावर गावाबाहेर काढून सन २०११-१२ मध्ये रामपूर या गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसित गावात १८ नागरी मुलभूत सुविधांचा वाणवा आहे. घर नाही, वीज नाही, पाणी नाही आणि धड रस्तेही नाही, उपजिविकेचे असलेली शेती हिरावल्या गेल्याने उपासमारीचे संकट ओढवले आहे. सन २००६ मध्ये जमिन अधिग्रहण करून जमिनीचा अवार्ड करण्यात आला. मात्र स्थलांतरण सन २०१२ मध्ये झाल्याने सन २०१२ प्रमाणे जमिनीची किंमत देण्यात यावी, कायद्यानुसार आदिवासींना पट्टे मिळावे याकरिता आदिवासी यांचा लढा सुरूच होता.दरम्यान मुलभूत सुविधा मिळणे बंद झाल्याने मूळगावी असलेल्या शेतीवर उदरनिर्वाह करता येईल, यासाठी पुनर्वसित गाव सोडून मूळ गावी परतले. चार दिवस लोटले तरी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही. त्यामुळे या आदिवसी बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान ८ आॅक्टोबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश राहांगडाले, अशोक उईके, अनिल टेकाम, लक्ष्मीकांत सलामे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी कमकासुर येथे भेट दिली असता आदिवासींच्या वास्तव जिवनाचे चित्र समोर आले. कमकासूर येथे प्रकल्पग्रस्तांची घरे पडलेली आहेत. तिथे तात्पुरते शेड असून अंधाराच्या काळोख्यात वन्यप्राण्यांच्या सावटात, हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे जगणे सुरू आहे. या जगण्याला वैतागलेल्या कचरू नेताम या आदिवासी बांधवाने सर्वांसमोर बावनथडी प्रकल्पातच उडी घेतली. मात्र प्रसंगावधानाने त्याला बाहेर काढून त्याची समजूत काढण्यात आली. आता आणखी किती दिवस वाट पाहावे, असे म्हणत दोन दिवसात तोडगा न निघाल्यास कमकासुर येथील २४५ ही आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असा इशारा त्यांनी दिला आहे.जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत मागे वळून पाहायचे नाही. सर्व प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेणार आहे.- किशोर उईके, सरपंच कमकासुर.प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय खपवून घेणार नाही. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता निवदने पाठविली आहेत. वेळप्रसंगी आदिवासीकरिता रस्त्यावरही उतरण्याची तयारी आहे.- राजेंद्र पटले, जिल्हाप्रमुख शिवसेना.रामपूर व गर्रा बघेडा पुनर्वसनस्थळावर मुलभूत सुविधांची माहिती घेण्यात आली. उपजिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आढावा घेऊन समस्या निकाली काढण्यात येईल.- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.