शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

सौंदळ पुनर्वसनातील पाणी पुरवठ्याची वीज कापली

By admin | Updated: July 25, 2016 00:37 IST

इंदिरा सागर गोसे प्रकल्पाच्या पोटातील सौंदळ खापरी पूनर्वसनात विविध समस्यांचा अंबार असून येथील ग्रामस्थ गेल्या ..

प्रकल्पग्रस्त पितात गढूळ पाणी : विहिरीत जंतनाशक औषध टाकलेच नाही, ठिय्या आंदोलनाचा इशाराप्रकाश हातेल चिचाळइंदिरा सागर गोसे प्रकल्पाच्या पोटातील सौंदळ खापरी पूनर्वसनात विविध समस्यांचा अंबार असून येथील ग्रामस्थ गेल्या एक महिन्यापासून बोअरवेल व विहिरीचे गढूळ पाणी पित आहेत. पाणी पुरवठा योजनेची वीज कपात केल्याने ग्रामस्थांवर असा प्रसंग ओढवला आहे.गावाचे पूनर्वसनकरतांना भौतिक सुविधा देण्याची आश्वासने देण्यात आली होते. परंतू अद्यापही नागरी सुविधांची पुर्तता शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातले. जिल्हाधिकारी गोसे पूनर्वसन अधिकाऱ्यांना नोटीस देवून समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. पूनर्वसन अधिकारी म्हणतात जिल्हा परिषदेला शिल्लक कामासाठी हस्तांतरित केले आहे. जिल्हा परिषद म्हणतो, पत्र नाही. यात मात्र प्रकल्पग्रस्त पिळल्या जात आहे. सदर समस्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा प्रकल्पग्रस्त मुलाबाळांसह भंडारा-पवनी मार्गावर ठिय्याआंदोलन करण्याचा इशारा दिला पुनर्वसन वासीयांनी दिला आहे.खापरी, सौंदळ पुनर्वसन संदर्भात अनेकदा लोकप्रतिनिधी व शासनाला लेखी निवेदने आंदोलने करुनही शासन कानाडोळा करीत आहे. पूनर्वसनात अद्यापही १८ नागरी सुविधाचंी पुर्तता केली नाही. कुणाला आर्थिक पॅकेज मिळाला नाहीर तर, कुणाला मोबदला मिळाला नाही तर कुणाला काहीच मिळाले नाही. ज्या गावकऱ्यांचे १५ ते २० वर्षापासून गावात वास्तव्य असून अशा व्यक्तींना कोणताच मोबदला मिळाला नाही पूनर्वसनस्थळी एक महिन्यापासून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथील नागरिकांना विहिरीचा व बोरवेलचा पावसाळ्याचा गढूळ पाणी पीत आहेत. ज्या पाण्यात प्रशासन ब्लीचिंग पावडरही सोडत नाही. त्यामुळे पूनर्वसनात आरोग्याला मोठी हानी होण्याची शक्यता आहे. जमीन दोस्त झालेल्या नाल्या दिसेनाशा झाल्याने पाणी सैराट मार्ग मिळेल त्या मार्गाने वाहत असतो. अरुंद नाली बांधकाम, गुरेचराई जागा, दहन भूमि उखळलेले रस्ते, विद्युत समस्या, बस थांबा अशा एक ना अनके समस्यांचा सामना प्रकल्पग्रस्तांना करावा लागत आहे. प्रकल्पबाधीत व पूनर्वसीत १८ नागरी सुविधा अपूर्ण असतांना शासनाने १०० टक्के पुनर्वसन झाल्याचे पत्रान्वये घोषणा देवून प्रकल्पग्रस्तांवर दबाव आणण्याचा डाव आहे. असा आरोप सरपंच राजहंस भुते व विज लिंबार्ते यांनी केला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असून गावठानावर प्रशासनाचे राज्य आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने १ महिन्यापासून पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. नाहीलाजास्तव विहिरीचे गढूळ पाणी प्याले लागत आहे. प्रशासन मात्र मृंग गिळुन गप्प बसला आहे. समस्या लोकप्रतिनिध्ीांना माहित असूनही लोकप्रतिनिधी गावांना भेट देत नाही. येत्या पंधरा दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी न लागल्यास संपूर्ण प्रकल्पग्रस्त मुलाबाळासह भंडारा-पवनी मार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय लिंबार्ते, प्रदीप गजभिये व प्रकल्प ग्रस्तांनी दिला आहे.शासनाने दिल्या नाहित सुविधासौंदळ या बाधीत गावात ज्यांना भुखंड नाही मिळाले ते अजुनही ६५ कुटूंब वास्तव्य करीत आहेत. शासनाने अद्यापही त्यांना भुखंड दिले नाही. तर काहीना भुखंड दिले तर घर बांधणीचा मोबदला दिला नसल्याने गावठाणात मोडक्याच घरात जीवन जगत आहेत. तर सौंदळ गटग्रामपंचायत मधील सुरबोडी गावाचे ८५ टक्के शेती बाधीत असून या गावाचा अद्यापही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्रस्त प्रकल्पग्रस्तांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला मात्र दोन महिने लोटूनही शासन कोणत्याच प्रकारचा पवित्रा घेत नाही. पूनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने त्रस्त प्रकल्पग्रस्तांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला. पूनर्वसनावर प्रशासनाचे राज्य आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेचा विज खंडीत झाल्याने नळ योजना १ महिना पासून बंद आहे याला पूनर्वसन अधिकारी जबाबदार आहेत त्यांनी वीज बिल भरावे.- राजहंस भुते, म्ताजी सरपंच ग्रा. पं. सौंदळनवीन गावठाणावर निवडणुकीचा बहिष्काराने प्रशासन बसले आहे. जो पर्यंत प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतला हस्तांतरीत होत नाही तो पर्यंत आम्हाला काहीच करता येणार नाही.- आर. डी. तलमासरे, विस्तार अधिकारी पं.स. पवनी