शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

सरपंचांचा कारभार तुटपुंज्या मानधनावर

By admin | Updated: February 11, 2017 00:27 IST

लोकसभा व विधानसभा सदस्य मानधन वाढावे, यासाठी एक विचाराने एकत्र येवून सरकारवर दबाव निर्माण करून मानधन वाढवून घेतात, ...

अन्यायाची भावना : गावातील प्रथम नागरिकाची उपेक्षा भंडारा : लोकसभा व विधानसभा सदस्य मानधन वाढावे, यासाठी एक विचाराने एकत्र येवून सरकारवर दबाव निर्माण करून मानधन वाढवून घेतात, मात्र ग्रामीण भागातील प्रथम नागरिक म्हणून ओळख असलेल्या सरपंचाना आजही तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामपंचायती देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे, असे शासन म्हणत असले तरी गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरपंचांना अवघे एक ते दोन हजार मानधन मिळत आहे. गावचा गाडा हाकणारे सरपंचपद मानाचे असले तरी तुटपुंज्या मानधनामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सरपंचांमध्ये मात्र, अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पत्र, शासन निर्णयानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार ग्रामपंचायत स्वायत्त संस्था असून शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नावर मानधन देण्यात येत होते. त्यानुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न १० हजार असेल तर सरपंचांना २०० रुपये, १० ते ३० हजार उत्पन्न असेल तर ३०० रुपये, तर ३० हजारापेक्षा जास्त असेल तर ४०० रुपये मानधन मिळत होते. त्याप्रमाणे प्रतिबैठक भत्ता १० रुपये होता, त्यानंतर त्यात कालानुरुप सुधारण करून लोकसंख्या दोन हजारापर्यंत असणाऱ्या गावच्या सरपंचांना ४००, २ हजार ते आठ हजार लोकसंख्येच्या सरपंचांना ६०० ते आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावच्या सरपंचांना ८०० रुपये मानधन दिले जात होते, तर ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता म्हणून २५ रुपये मिळत होते.राज्यातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी मानधन वाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने १५ आॅगस्ट २०१४ पासूनच्या नवीन आदेशानुसार २ हजार लोकसंख्येच्या सरपंचाला १ हजार, ८ हजार लोकसंख्या असेल तर १५०० आणि ८ हजार लोकसंख्येच्या पुढील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना २ हजार रुपये मानधन जाहीर केले. त्याप्रमाणे उपसरपंचांना इतर सदस्यांप्रमाणे १२ बैठका झाल्यानंतर २०० रुपये प्रतिबैठक म्हणून भत्ता दिला जाणार आहे. यासाठी शासन ७५ टक्के अनुदान देणार आहे. सरपंचांना मानधनात वाढ झाली असली तरी काही सरपंचांना मात्र याची माहितीच नसून जुन्याच नियमाप्रमाणे मानधन मिळत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)