शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

पालिकेच्या चाळीत ‘गांजा’चा अड्डा

By admin | Updated: December 2, 2014 22:59 IST

एकेकाळी शांतता आणि एकोपा जपणारे शहर म्हणून नावारुपाला आलेले भंडारा शहर आता गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र ठरले आहे. गांजा सेवनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत

पोलिसांचे ‘व्हिजीट बुक’ ठरले शो पीसभंडारा : एकेकाळी शांतता आणि एकोपा जपणारे शहर म्हणून नावारुपाला आलेले भंडारा शहर आता गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र ठरले आहे. गांजा सेवनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तर या नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेक तरुणांचे शरीर ऐन तरुणपणात मरतकुडे झाले आहे.शहरातील सामान्य रुग्णालयाकडे जाणारा बसस्थानक परिसर, लायब्ररी चौकातील पालिकेचा बगिचा परिसर जे.एम. पटेल महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील ओसाड बगिचा, राजीव गांधी चौक आणि टप्पा मोहल्ला परिसरात प्रमाणात गांजाची विक्री होते. परंतु, गांजाची सर्वाधिक विक्री बसस्थानकाच्या मागील परिसरातील नगर पालिकेच्या निर्माणाधीन चाळीत सुरू आहे. त्यामुळे गांजा विक्रीच्या या परिसराला संवेदनशील ठरवून भंडारा पोलिसांनी त्याठिकाणी फिरते पोलीस पथक तैनात केले आहे. या पथकाला परिसरात भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येकजण आपली ‘ड्युटी’ चोखपणे बजावतात की नाही, यासाठी एका दुकानात ‘व्हिजीट बुक’ ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे ‘ड्युटी’वर असलेल्या पोलिसांना दर तासाला त्या परिसरात फेरफटका मारणे अनिवार्य आहे. गस्त करताना काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत एकालाही पकडण्यात आलेले नाही. कुंपन जिथे शेत खाते तेव्हा... गुन्हेगारांना पकडणार तरी कोण? असा सवाल त्या परिसरातील दुकानदारांचा आहे. ‘ड्युटी’वर असलेले पोलीस दरतासाला नियमित हजेरी लावतात खरे. परंतु कुठेही फेरफटका न मारता ‘व्हिजीट बुक’वर ‘या परिसरात शांतता आहे’, असे लिहून मोकळे होतात. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून नित्यनेमाने सुरू असून हे ‘व्हिजीट बुक’ केवळ सही करण्यापुरते शोभेचे ठरले आहे. ‘लोकमत’ चमूने याठिकाणी सुमारे तास ठाण मांडून ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता या ठिकाणी विकण्यात येणारा गांजा आणि पोलिसांची कर्तव्यशून्यता उघडकीस आली. या चार तासांच्या अवधीमध्ये दुपारी २ वाजता महिला चालक असलेले फिरते वाहन आले. त्यातून दोन महिला पोलीस उतरल्या. खुंटीला टांगून असलेल्या ‘व्हीजीट बुक’मध्ये ‘परिसरात शांतता आहे’, असे लिहून निघून गेल्या. त्यानंतर पोलीस गणवेशातील एक पोलीस कर्मचारी दुचाकीने आले, त्यांनीही खुंटीवरच्या ‘व्हीजीट बुक’मध्ये परिसरात शांतता आहे, असे लिहून निघून गेले. असा प्रकार प्रत्येक तासानंतर सुरू राहिला. त्यानंतर ‘लोकमत’ चमूने याबद्दल परिसरातील दुकानदारांना बोलते केले असता ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून या परिसरात गांजा विकला जातो. त्यांची दहशत आहे. या परिसरात खासगी प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या आॅटो, जीपमध्ये बसून हे तस्कर गांजाची विक्री करतात. आॅटोमध्ये बसू नका, असे एखाद्याने चालकाने हटकले तर त्यांच्याशी हमरीतुमरी करीत असल्याचे वाहनचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हा प्रकार इतक्या दिवसांपासून सुरु असतानाही पोलीस येतात आणि काय करतात, हेच आम्हाला कळत नसल्याचेही त्यांचे म्हणने आहे. काहींनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले की, पोलिसांना सर्व काही माहित आहे, परंतु तस्करांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांचे कोण बिघडविणार? उद्या छापून येईल. परवा पुन्हा जैसे थे’ स्थिती राहील, असे सांगून जोपर्यंत ‘कर्तव्यदक्ष’ पोलीस अधिकारी जिल्ह्यात येणार नाहीत, तोपर्यंत हा प्रकार असाच सुरू राहील, असे सांगून त्या व्यावसायिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्ध संताप व्यक्त केला.(लोकमत चमू)