शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बपेरा आंतरराज्यीय सीमेवर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशहराच्या सीमाही बंद : पोलिसांकडून तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात संचारबंदी कायदा लागू झाला आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा येथील आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आंतरराज्यीय सीमा बंद करण्यात आले आहे. तिरोडा शहराच्या सीमा देखील बंद होणार असल्याची माहिती आहे.राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.गावपातळीवर पोलीस पाटलांच्या मदतीने सरपंच, पोलीस कर्मचारी संचारबंदीबद्दल लोकांना मार्गदर्शन करीत आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराची सीमा सिमेलगत तुमसर शहर येत असल्याने मार्गावरील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते. गत आठवड्यात मध्यप्रदेशातील काही मजूरवर्ग पुणे, औरंगाबाद येथून परतल्याने सिहोरा परिसरातील नागरिकानी भीती व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बपेरा आंतरराज्यीय सीमा सील करण्यात आली आहे. सकाळी बपेरा आंतरराज्यीय सीमेवर वाहनाची वार्दळ कमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचा धरण मार्ग बंद करण्यात आलेला नाही. मात्र मार्गावर बॅरिकेट लावण्यात येणार आहेत. परिसरातील गावाचे शेजारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याची सीमा आहे. त्यामुळे कवलेवाडा धरण मार्गावरून नागरिकांची अद्यापही वर्दळ आहे. सायंकाळ होताच धरण मार्गावरून रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर रांगा दिसून येत आहेत.कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे उद्योगधंदे बंद करण्यात आले आहे. मात्र तरी देखील रेतीचा उपसा सुरू असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजेपेक्षा रेती वाहतूक महत्वाची आहे का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहे.वांगी-मांडवी गावातून दररोज ३० ते ४० ट्रक धरण मार्गाने दाखल होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून धरण मार्ग देखील कायमस्वरूपी सील करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.लग्नाच्या तारखात वाढनागरिकांच्या गर्दीवर आळा घालण्यासाठी परिसरातील ४० ते ५० वधू-वरांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय अन्य वास्तूशांती, साक्षगंध, धार्मिक कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. अपवादात्मक परिस्थिती लग्नासाठी १० ते १५ नातेवाईकांची काही काळानंतर उपस्थिती राहणार आहे. कोरोना वासरसच्या भीतीमुळे अनोळखी इसमांना गावातून हाकलून लावण्यात येत आहे. जिल्हा बाहेरून आलेले नागरिक प्रशासनास माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या