लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात संचारबंदी कायदा लागू झाला आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा येथील आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आंतरराज्यीय सीमा बंद करण्यात आले आहे. तिरोडा शहराच्या सीमा देखील बंद होणार असल्याची माहिती आहे.राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.गावपातळीवर पोलीस पाटलांच्या मदतीने सरपंच, पोलीस कर्मचारी संचारबंदीबद्दल लोकांना मार्गदर्शन करीत आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराची सीमा सिमेलगत तुमसर शहर येत असल्याने मार्गावरील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते. गत आठवड्यात मध्यप्रदेशातील काही मजूरवर्ग पुणे, औरंगाबाद येथून परतल्याने सिहोरा परिसरातील नागरिकानी भीती व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बपेरा आंतरराज्यीय सीमा सील करण्यात आली आहे. सकाळी बपेरा आंतरराज्यीय सीमेवर वाहनाची वार्दळ कमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचा धरण मार्ग बंद करण्यात आलेला नाही. मात्र मार्गावर बॅरिकेट लावण्यात येणार आहेत. परिसरातील गावाचे शेजारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याची सीमा आहे. त्यामुळे कवलेवाडा धरण मार्गावरून नागरिकांची अद्यापही वर्दळ आहे. सायंकाळ होताच धरण मार्गावरून रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर रांगा दिसून येत आहेत.कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे उद्योगधंदे बंद करण्यात आले आहे. मात्र तरी देखील रेतीचा उपसा सुरू असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजेपेक्षा रेती वाहतूक महत्वाची आहे का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहे.वांगी-मांडवी गावातून दररोज ३० ते ४० ट्रक धरण मार्गाने दाखल होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून धरण मार्ग देखील कायमस्वरूपी सील करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.लग्नाच्या तारखात वाढनागरिकांच्या गर्दीवर आळा घालण्यासाठी परिसरातील ४० ते ५० वधू-वरांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय अन्य वास्तूशांती, साक्षगंध, धार्मिक कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. अपवादात्मक परिस्थिती लग्नासाठी १० ते १५ नातेवाईकांची काही काळानंतर उपस्थिती राहणार आहे. कोरोना वासरसच्या भीतीमुळे अनोळखी इसमांना गावातून हाकलून लावण्यात येत आहे. जिल्हा बाहेरून आलेले नागरिक प्रशासनास माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST
राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर बंदोबस्त
ठळक मुद्देशहराच्या सीमाही बंद : पोलिसांकडून तपासणी मोहीम