शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बपेरा आंतरराज्यीय सीमेवर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशहराच्या सीमाही बंद : पोलिसांकडून तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात संचारबंदी कायदा लागू झाला आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा येथील आंतरराज्यीय सीमेवर पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आंतरराज्यीय सीमा बंद करण्यात आले आहे. तिरोडा शहराच्या सीमा देखील बंद होणार असल्याची माहिती आहे.राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सिहोरा परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या निर्देशानुसार गावागावात संचारबंदीबद्दल जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.गावपातळीवर पोलीस पाटलांच्या मदतीने सरपंच, पोलीस कर्मचारी संचारबंदीबद्दल लोकांना मार्गदर्शन करीत आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहराची सीमा सिमेलगत तुमसर शहर येत असल्याने मार्गावरील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते. गत आठवड्यात मध्यप्रदेशातील काही मजूरवर्ग पुणे, औरंगाबाद येथून परतल्याने सिहोरा परिसरातील नागरिकानी भीती व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बपेरा आंतरराज्यीय सीमा सील करण्यात आली आहे. सकाळी बपेरा आंतरराज्यीय सीमेवर वाहनाची वार्दळ कमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचा धरण मार्ग बंद करण्यात आलेला नाही. मात्र मार्गावर बॅरिकेट लावण्यात येणार आहेत. परिसरातील गावाचे शेजारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याची सीमा आहे. त्यामुळे कवलेवाडा धरण मार्गावरून नागरिकांची अद्यापही वर्दळ आहे. सायंकाळ होताच धरण मार्गावरून रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर रांगा दिसून येत आहेत.कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे उद्योगधंदे बंद करण्यात आले आहे. मात्र तरी देखील रेतीचा उपसा सुरू असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजेपेक्षा रेती वाहतूक महत्वाची आहे का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहे.वांगी-मांडवी गावातून दररोज ३० ते ४० ट्रक धरण मार्गाने दाखल होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून धरण मार्ग देखील कायमस्वरूपी सील करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.लग्नाच्या तारखात वाढनागरिकांच्या गर्दीवर आळा घालण्यासाठी परिसरातील ४० ते ५० वधू-वरांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय अन्य वास्तूशांती, साक्षगंध, धार्मिक कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. अपवादात्मक परिस्थिती लग्नासाठी १० ते १५ नातेवाईकांची काही काळानंतर उपस्थिती राहणार आहे. कोरोना वासरसच्या भीतीमुळे अनोळखी इसमांना गावातून हाकलून लावण्यात येत आहे. जिल्हा बाहेरून आलेले नागरिक प्रशासनास माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या