शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला बँकांनी फासला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांकरिता प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल या उद्देशाने अंमलात आणल्या गेला. मात्र मागील दोन ...

नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांकरिता प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल या उद्देशाने अंमलात आणल्या गेला. मात्र मागील दोन वर्षांपासून या कार्यक्रमाला बँक व्यवस्थापकांनी अडगळीत ठेवला असल्याने मागील दीड-दोन वर्षांपासून शेकडो युवकांचे कर्ज प्रकरणे निकाली निघाले नाही. कोरोना महामारीमुळे खासगी नोकरदारांना आपल्या नोकरी गमवावी लागली. त्यामुळे ते युवक गावाकडे परत आले आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योगमार्फत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज प्रस्ताव दाखल केले. आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तत: केली. परंतु, बँकांनी सदर कार्यक्रमांतर्गतचे कर्ज प्रकरणे निकाली न काढता अडवून ठेवले आहेत. यामुळे शेकडो युवकांची मानसिकता बँक व्यवस्थापकांच्या हेकेखोरपणामुळे ढासळली आहे.

कार्यक्रम नवव्यावसायिक निर्माण करणारा असल्याने भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खा. सुनील मेंढे यांनी फेब्रुवारी महिन्यात कार्यक्रमाचा आढावा घेऊन कर्ज प्रकरणे अडवून ठेवू नये, असे निर्देश दिले होते. मात्र निर्देशाचा बँक व्यवस्थापकांवर पडला नाही. उलट कोरोनाचा बहाना मारून प्रकरणे दाबून ठेवले आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गतचे कर्ज प्रस्ताव निकाली काढण्याचे बंधन बँकांना नसेल तर मग असे उपक्रम राबवायचेच कशाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

युवकांवर वाढला कर्जाचा बोझा

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रस्ताव लवकर निकाली निघेल आणि व्यवसाय सुरू करता येईल, या उद्देशाने कर्ज प्रस्ताव टाकलेल्या शेकडो युवकांनी दीड-दोन वर्षांपासून भाडेकरारावर जागा घेतली. मात्र बँकांनी कर्ज प्रस्ताव निकाली काढले नाही आणि व्यवसाय सुरू होऊ शकले नाही. मात्र, करारावर घेतलेल्या जागेचा भाडा मात्र नियमितपणे भरावा लागत आहे. यासाठी पतसंस्था तसेच खासगीतून कर्ज घेऊन जागेचा भाडा भरावा लागत आहे. यातून युवकांवर कर्जाचा बोझा वाढला आहे.

बॉक्स

संस्थांची भूमिका काय?

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग या सरकारी संस्था नियुक्त करण्यात आल्या आहेत. बँकांकडे ऑनलाइन कर्ज प्रस्ताव दाखल करणे एवढेच या संस्थांची भूमिका आहे का? बँकांकडे कर्ज प्रस्ताव दाखल केल्यानंतर कर्ज प्रकरण निकाली निघावा यासाठी साधा पाठपुरावाही या संस्थांनी बँकेकडे केला नाही. पाठपुरावा करण्याची जबाबदारी या संस्थांची नाही का? या प्रश्न उपस्थित होत आहे.

बँक व्यवस्थापकांकडून टाळाटाळ

अनेक युवकांनी दीड-दोन वर्षांपासून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रस्ताव बँकांकडे दाखल केले आहेत. मात्र, कर्ज प्रस्ताव निकाली न काढता वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ करण्यात येत आहे. झोनल कार्यालयातकडे प्रकरण पाठविले आहे. कोरोनामुळे कर्ज देणे बंद आहे अशी वेगवेगळी कारणे देऊन बँक व्यवस्थापकांकडून टाळाटाळ केल्या जात आहे.