शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

येथील राजीव गांधी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेलगतच एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबूक प्रिटींग मशीन आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा तास प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे हा चोरटा तेथून निघून गेला.

ठळक मुद्देराजीव गांधी चौकातील घटना : गॅस कटरचा उपयोग, रोख सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील राजीव गांधी चौकातील बँक ऑफ इंडिया शाखेलगत असलेले एटीएम गॅस कटरच्या सहायाने फोडण्याचा प्रयत्न रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. प्रयत्न करूनही मशीन फुटली नाही. त्यामुळे संपूर्ण रक्कम सुरक्षित राहिली. भंडारा शहरात एटीएम फोडण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.येथील राजीव गांधी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेलगतच एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबूक प्रिटींग मशीन आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा तास प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे हा चोरटा तेथून निघून गेला.तो चारचाकी वाहनाने आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत असून चेहरा बांधलेला होता.या घटनेची माहिती सकाळी बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला झाली. त्यांनी तात्काळ भंडारा शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ्श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु श्वानानेही माग दाखविला नाही. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, भंडारा शहरचे प्रभारी ठाणेदार साठवणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि भंडारा ठाण्याचे डीबी पथक घटनास्थळी पोहचले.भंडारा शहरात एटीएम फोडण्याची ही पहिलीच घटना होय. चोरट्यांना मशीन फोडण्यात यश न आल्याने एटीएममधील रक्कम सुरक्षित राहिली. या एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा दिसत असला तरी तोंडाला स्कार्फ बांधून असल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे.एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरभंडारा शहरात विविध बँकांचे चौकाचौकात एटीएम आहे. बहुतांश एटीएम रामभरोसे दिसत आहे. खासगी बँकांच्या एटीएमसमोर सुरक्षा रक्षक असतो. परंतु राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमसमोर सुरक्षा रक्षकाचा अभाव असतो. रात्रीच्यावेळी येथे कुणीही नसते. सुरक्षा रक्षकाअभावी एटीएमची सुरक्षाच धोक्यात आली आहे.बँकाची सुरक्षा ऐरणीवरऐन निवडणुकीच्या काळात साकोली येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी झाली होती. चोरट्यांनी तब्बल दोन कोटी रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. विशेष म्हणजे बनावट चाबीने स्ट्राँग रूमचे कुलूप उघडून आतील रोख व सोने लंपास केले होते. यापुर्वीही जिल्ह्यात बँक फोडण्याचा आणि एटीएममध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्यानंतरही बँकांनी सुरक्षाच्या योजना केल्या नाही.

टॅग्स :Thiefचोरatmएटीएम