शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आरक्षित जमिनीवरील खरेदी विक्रीची बंदी मागे

By admin | Updated: December 12, 2015 00:40 IST

गोसे व बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ज्या शेतकऱ्यांकडे आठ एकराच्या वर स्वत:च्या मालकीची सुपीक उपजावू शेती आहे ..

निर्णय : वाघमारे यांची माहिती भंडारा : गोसे व बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने ज्या शेतकऱ्यांकडे आठ एकराच्या वर स्वत:च्या मालकीची सुपीक उपजावू शेती आहे अशी शेती आरक्षीत करून ठेवली होती त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी विक्री प्रक्रिया करता येत नव्हती. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. परंतु सध्या प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात असल्याने व यापुढे भंडारा जिल्ह्यातील आरक्षित असलेली शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीची आवश्यकता भासणार नसल्यामुळे ही बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आढावा बैठकीत आ. चरण वाघमारे यांनी केली असता याबाबत चर्चा करून आरक्षित जमिनीवरील खरेदी विक्रीची बंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली आहे.गोसे व बावनथडी प्रकल्प पुर्ण करणे तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे आठ एकराच्यावर उपजावू सुपिक शेतजमीन आहे, अशा शेतकऱ्यांची जमीन पुनर्वसनाच्या कामासाठी आरक्षित करून ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना आर्थिक गरज भासल्यास सदर आरक्षित जमिनीची खरेदी विक्री करने अशक्य झाले होते. ही बाब आ.चरण वाघमारे यांच्या निर्दशनास येताच त्यांनी १० डिसेंबर रोजी आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. चर्चा करून जमिनी पुनर्वसनाकरीता आरक्षित करण्यात आल्या होत्या. अशा शेतकऱ्यांच्या जमिनीची सध्या आवश्यकता नसल्याने बंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतचे निर्देश शासन प्रशसन स्तरावरील यंत्रणेत दिले आहेत. आढावा बैठकीतपालकमंत्री डॉ. दिलीप सावंत, खा. नाना पटोले, आ. चरण वाघमारे, आ. अवसरे, आ. काशीवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार खाते प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी )