शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

बाळापूरवासीयांचा मायनिंग परिसरातून जीव धोक्यात घालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST

तुमसर : स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही जगप्रसिद्ध मँगेेनीज खाण असलेल्या बाळापूर गावात जाण्यासाठी सुरक्षित रस्ता नाही. येथील रहिवाशांना मायनिंग क्षेत्रातून ...

तुमसर : स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही जगप्रसिद्ध मँगेेनीज खाण असलेल्या बाळापूर गावात जाण्यासाठी सुरक्षित रस्ता नाही. येथील रहिवाशांना मायनिंग क्षेत्रातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. बाळापूर हा रस्ता वनकायद्यात रखडला आहे. त्यामुळे नागरिकांना आठ ते दहा किलोमीटरचा लांबून टप्पा गाठावा लागतो.

जगप्रसिद्ध मँगेेनीज खाण असलेले बाळापूर हमेशा हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. १९७८ मध्ये ही खाण भारत सरकारने अधिग्रहित केली होती. १९७७ पर्यंत ही खाण सीपीएमओ कंपनीच्या ताब्यात होती. आता ही खान मँगेेनीज ऑल इंडिया लिमिटेडच्या नावाने ओळखली जाते. मँगेेनीज खाण परिसरातून कुरमुडा, देवनारा, बाळापूर हमेशा येथील नागरिक या रस्त्याने ये-जा करीत होते. मायनिंगचा विस्तार झाल्याने मायनिंग परिसरातून येणेजाणे धोकादायक झाले आहे. केंद्र व राज्य शासनाला या खाणीतून कोट्यवधींचा महसूल प्राप्त होतो. परंतु, बाळापूर हमेशा या गावाला जाण्याकरिता पक्का रस्ता नाही. बाळापूरला जाण्याकरिता बाजार टोला, कुरमुडा या गावांवरून जावे लागते.

बाळापूर हमेशा गावाला जाण्याकरिता आठ ते दहा किलोमीटरच्या फेरा मारून जावे लागत असल्याने बहुसंख्य नागरिक धोकादायक मायनिंग परिसरातून प्रवास करतात. १९८० मध्ये तत्कालीन आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत पवनारखारी आदिवासी आश्रमशाळेसमोरून बाळापूर हमेशा गावाला जाणारा रस्त्याचे बांधकाम केले होते. सदर रस्त्याचे ते कच्चे बांधकाम होते. केंद्र शासनाने वनकायदा आणल्याने सदर रस्ता बांधकाम रखडले. मॉयल प्रशासनाने रस्ता बांधकाम करताना निविदा काढली होती. परंतु, वनविभागाने रस्त्याचे बांधकाम रोखले. त्यामुळे बाळापूर या गावाला जाण्याकरिता जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी

बाळापूर हमेशा या गावाला जाण्याकरिता बाजार टोला, कुरमुडावरून आठ ते दहा किलोमीटर अंतराच्या फेऱ्याने जावे लागते. पवनारखारीवरून बाळापूर हे गाव केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षित प्रवासाकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्ता बांधकामाचा तिढा सोडवण्याची गरज आहे.