शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

भंडाऱ्यात बहुजन क्रांती मोर्चाची रविवारला धडक

By admin | Updated: January 4, 2017 00:44 IST

जातीय तेढ निर्माण करून जातीजातींमध्ये अविश्वास व द्वेश भावना पसरविण्याचे षडयंत्र सुरु आहे.

५० संघटनांचा समावेश : दसरा मैदानावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार भंडारा : जातीय तेढ निर्माण करून जातीजातींमध्ये अविश्वास व द्वेश भावना पसरविण्याचे षडयंत्र सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे महापुरुषांचे कार्य पुढे नेणे ही सर्वांची जवाबदारी आहे. समाजातील जातीसमूह व घटकांचे एकत्रिकरण करून बहुजन समाजाच्या हक्क अधिकारांच्या समर्थनार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रविवारी भंडाऱ्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य संयोजक समीर कदम यांनी आज पत्रपरिषदेत दिली. वाढत्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ओबीसी, एस.टी., व्ही.जे.एन.टी., डी.एन.टी., बलुतेदार व धार्मिक अल्पसंख्यांक यांचा बहुजन क्रांती मोर्चा आयोजित केला आहे. रविवारला हा मोर्चा दसरा मैदान येथून निघणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचेल. तत्पूर्वी या मोर्चाला समर्थन दिलेल्या ५० विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दसरा मैदानावर एकत्रित होतील. तिथे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघेल. या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोपर्डी येथील अत्याचार करणाऱ्यावर व आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, पीडितांना संरक्षण देऊन न्याय द्यावा, देशात महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, राष्ट्रीय स्तरावर एस.टी., एस.सी. प्रमाणे ओबीसी, भटके विमुक्त प्रवर्ग व बलुतेदार यांची जातीनिहाय जनगणना करावी, राखीव जंगलावरील नोकरीतील अनुशेष तात्काळ भरावा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजाला सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून १२ टक्के आरक्षण लागू करावे, ग्रामपातळीवर सेवा देणारे कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी अहमदनगर कोल्हापूर, पुणे, पालघर, नाशिक, रायगड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला असून येत्या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध तारखेला मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती समीर कदम यांनी दिली. पत्रपरिषदेला प्राध्यापक वासनिक, बळीराम सार्वे, विलास खोब्रागडे, नरेंद्र मडावी, शीतल पिल्लेवान, सुधीर पिल्लेवान, माधवराव फसाटे, देवचंद वैद्य यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)