शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

१०० कामगार कारखान्यातून बडतर्फ

By admin | Updated: January 29, 2016 04:06 IST

युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी

तुमसर : युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी कामगार संघटना स्थापन केल्याने रोजंदारी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वाद आहे. नियमानुसार वेतन, सुविधा नाही, महिन्यातून जेव्हा कारखान्यात काम राहील, तेव्हा बोलाविण्यात येईल, असा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. याप्रकरणी कामगारांनी तुमसर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.माडगी (मानेकनगर) येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे १०० रोजंदारी कामगार आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. प्रथम महिन्यातून २६ दिवस, नंतर १९ दिवस व एक महिन्यापूर्वी कामगार संघटना स्थापन केल्यानंतर जेव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा बोलाविण्यात येईल, असा आदेश कंपनी व्यवस्थापनाने दिला. गुरुवारी सकाळी ८ वाजता १०० कामगार आले. परंतु कारखान्याच्या सुरक्षारक्षकाने त्यांना कारखान्यात जाण्यासाठी मज्जाव करून तुम्हाला कारखान्यात जाता येणार नाही, असे सांगितले.रोजंदारी कामगारासोबत चर्चा करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाचा कुणीही अधिकारी आले नाही. दुपारी दोन वाजताच्या शिफ्टमध्ये १०० पैकी चार ते पाच कामगारांना घेता येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर १८ कामगारांना घेण्यात येत आहे, असे व्यवस्थापनाने सांगितले.एक महिन्यापूर्वी रोजंदारी कामगारांनी भंडारा जिल्हा कामगार संघाची शाखा येथे सुरु केली. संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत कारखान्याबाहेर संघाचा फलक लावला. बुधवारी रात्री हा फलक येथे काढण्यात आला. यासंदर्भात पोलिसात तक्रार देऊन कंपनी व्यवस्थापन व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी कामगार म्हणाले, आम्हाला मागील काही महिन्यापासून या कामगारांना १९ दिवसाचा पगार ४,४६५ देण्यात येत आहे. रोजंदारी कामगारांना २३५ रुपये मजुरी मिळते. कंपनी प्रशासन किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा, घरभाडे भत्त्यांपासून वंचित ठेवत आहे. रोजंदारी कामगार उत्पादन प्रक्रियेत आॅपरेटर मदतनिसची कामे दिवसरात्र पाळीमध्ये करतात. रोजंदारी कामगार रामदास हलमारे, कैलास दामन, मुरलीधर कनपटे, चंद्रकुमार कुथे, रंजित कटरे, मुकुंद बांते कारखान्यात दि. १६ जानेवारीला आले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी अर्वाच्च शब्दात बोलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या प्रकरणाची तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली, परंतु पोलिसांकडून चौकशी करण्यात आली नसल्याचाही कामगारांनी आरोप केला आहे.कामगारांना काढून टाकण्यात आल्यामुळे रोजंदारी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले असून कारखान्यातील अनियमितेबद्दल चौकशी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. यासंदर्भात कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जुनारकर, चक्रवर्ती यांच्याशी संपर्क केले असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (तालुका प्रतिनिधी)रोजंदारी कामगारांनी संघटित होऊन न्याय हक्काकरिता संघटना स्थापन केली. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाने दडपशाही प्रवृत्तीचा अवलंब केला. न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार आहे.- श्रीकांत पंचबुद्धे,अध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि. कामगार संघ, भंडारा.