शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

१०० कामगार कारखान्यातून बडतर्फ

By admin | Updated: January 29, 2016 04:06 IST

युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी

तुमसर : युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी कामगार संघटना स्थापन केल्याने रोजंदारी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वाद आहे. नियमानुसार वेतन, सुविधा नाही, महिन्यातून जेव्हा कारखान्यात काम राहील, तेव्हा बोलाविण्यात येईल, असा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. याप्रकरणी कामगारांनी तुमसर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.माडगी (मानेकनगर) येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे १०० रोजंदारी कामगार आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. प्रथम महिन्यातून २६ दिवस, नंतर १९ दिवस व एक महिन्यापूर्वी कामगार संघटना स्थापन केल्यानंतर जेव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा बोलाविण्यात येईल, असा आदेश कंपनी व्यवस्थापनाने दिला. गुरुवारी सकाळी ८ वाजता १०० कामगार आले. परंतु कारखान्याच्या सुरक्षारक्षकाने त्यांना कारखान्यात जाण्यासाठी मज्जाव करून तुम्हाला कारखान्यात जाता येणार नाही, असे सांगितले.रोजंदारी कामगारासोबत चर्चा करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाचा कुणीही अधिकारी आले नाही. दुपारी दोन वाजताच्या शिफ्टमध्ये १०० पैकी चार ते पाच कामगारांना घेता येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर १८ कामगारांना घेण्यात येत आहे, असे व्यवस्थापनाने सांगितले.एक महिन्यापूर्वी रोजंदारी कामगारांनी भंडारा जिल्हा कामगार संघाची शाखा येथे सुरु केली. संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत कारखान्याबाहेर संघाचा फलक लावला. बुधवारी रात्री हा फलक येथे काढण्यात आला. यासंदर्भात पोलिसात तक्रार देऊन कंपनी व्यवस्थापन व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी कामगार म्हणाले, आम्हाला मागील काही महिन्यापासून या कामगारांना १९ दिवसाचा पगार ४,४६५ देण्यात येत आहे. रोजंदारी कामगारांना २३५ रुपये मजुरी मिळते. कंपनी प्रशासन किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा, घरभाडे भत्त्यांपासून वंचित ठेवत आहे. रोजंदारी कामगार उत्पादन प्रक्रियेत आॅपरेटर मदतनिसची कामे दिवसरात्र पाळीमध्ये करतात. रोजंदारी कामगार रामदास हलमारे, कैलास दामन, मुरलीधर कनपटे, चंद्रकुमार कुथे, रंजित कटरे, मुकुंद बांते कारखान्यात दि. १६ जानेवारीला आले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी अर्वाच्च शब्दात बोलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या प्रकरणाची तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली, परंतु पोलिसांकडून चौकशी करण्यात आली नसल्याचाही कामगारांनी आरोप केला आहे.कामगारांना काढून टाकण्यात आल्यामुळे रोजंदारी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले असून कारखान्यातील अनियमितेबद्दल चौकशी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. यासंदर्भात कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जुनारकर, चक्रवर्ती यांच्याशी संपर्क केले असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (तालुका प्रतिनिधी)रोजंदारी कामगारांनी संघटित होऊन न्याय हक्काकरिता संघटना स्थापन केली. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाने दडपशाही प्रवृत्तीचा अवलंब केला. न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार आहे.- श्रीकांत पंचबुद्धे,अध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि. कामगार संघ, भंडारा.