शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१०० कामगार कारखान्यातून बडतर्फ

By admin | Updated: January 29, 2016 04:06 IST

युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी

तुमसर : युनिडेरीडेंट कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यातील १०० रोजंदारी कामगारांना येण्यासाठी मज्जाव केला. कामगारांनी कामगार संघटना स्थापन केल्याने रोजंदारी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वाद आहे. नियमानुसार वेतन, सुविधा नाही, महिन्यातून जेव्हा कारखान्यात काम राहील, तेव्हा बोलाविण्यात येईल, असा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. याप्रकरणी कामगारांनी तुमसर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.माडगी (मानेकनगर) येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे १०० रोजंदारी कामगार आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. प्रथम महिन्यातून २६ दिवस, नंतर १९ दिवस व एक महिन्यापूर्वी कामगार संघटना स्थापन केल्यानंतर जेव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा बोलाविण्यात येईल, असा आदेश कंपनी व्यवस्थापनाने दिला. गुरुवारी सकाळी ८ वाजता १०० कामगार आले. परंतु कारखान्याच्या सुरक्षारक्षकाने त्यांना कारखान्यात जाण्यासाठी मज्जाव करून तुम्हाला कारखान्यात जाता येणार नाही, असे सांगितले.रोजंदारी कामगारासोबत चर्चा करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाचा कुणीही अधिकारी आले नाही. दुपारी दोन वाजताच्या शिफ्टमध्ये १०० पैकी चार ते पाच कामगारांना घेता येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर १८ कामगारांना घेण्यात येत आहे, असे व्यवस्थापनाने सांगितले.एक महिन्यापूर्वी रोजंदारी कामगारांनी भंडारा जिल्हा कामगार संघाची शाखा येथे सुरु केली. संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत कारखान्याबाहेर संघाचा फलक लावला. बुधवारी रात्री हा फलक येथे काढण्यात आला. यासंदर्भात पोलिसात तक्रार देऊन कंपनी व्यवस्थापन व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी कामगार म्हणाले, आम्हाला मागील काही महिन्यापासून या कामगारांना १९ दिवसाचा पगार ४,४६५ देण्यात येत आहे. रोजंदारी कामगारांना २३५ रुपये मजुरी मिळते. कंपनी प्रशासन किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य सुविधा, घरभाडे भत्त्यांपासून वंचित ठेवत आहे. रोजंदारी कामगार उत्पादन प्रक्रियेत आॅपरेटर मदतनिसची कामे दिवसरात्र पाळीमध्ये करतात. रोजंदारी कामगार रामदास हलमारे, कैलास दामन, मुरलीधर कनपटे, चंद्रकुमार कुथे, रंजित कटरे, मुकुंद बांते कारखान्यात दि. १६ जानेवारीला आले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी अर्वाच्च शब्दात बोलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या प्रकरणाची तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली, परंतु पोलिसांकडून चौकशी करण्यात आली नसल्याचाही कामगारांनी आरोप केला आहे.कामगारांना काढून टाकण्यात आल्यामुळे रोजंदारी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले असून कारखान्यातील अनियमितेबद्दल चौकशी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. यासंदर्भात कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक जुनारकर, चक्रवर्ती यांच्याशी संपर्क केले असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (तालुका प्रतिनिधी)रोजंदारी कामगारांनी संघटित होऊन न्याय हक्काकरिता संघटना स्थापन केली. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाने दडपशाही प्रवृत्तीचा अवलंब केला. न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार आहे.- श्रीकांत पंचबुद्धे,अध्यक्ष, भंडारा जिल्हा इंजि. कामगार संघ, भंडारा.