शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पावसाने आले शेतकऱ्यांवर बुरे दिन; रबी पिकांची हानी

By admin | Updated: March 8, 2015 00:26 IST

अवकाळी पावसामुळे चौरास परिसरात मोठ्या प्रमाणावर रबी पिकांची हानी आलेली आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर ....

आसगाव (चौ.) : अवकाळी पावसामुळे चौरास परिसरात मोठ्या प्रमाणावर रबी पिकांची हानी आलेली आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेती पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रविवारला आलेल्या पावसाएवढा जोराचा होता की शेतातील सारे काम बंद पडले आहेत. या पावसाने मूग, उडीद, गहू, चणा, तूर, जवस धनिया ही पिके पावसाने पूर्णपणे भिजलेली आहेत. त्यांना सुकविता आले नाही तर या मालाला बुरशी लागून काळे पडत असतात. अशावेळी हा माल विक्रीसाठी योग्य नसते. तर पिकांवर पाणी गेल्यानंतर गव्हाचा रंग उतरतो व तो पांढरा होत असतो. त्यामुळे हा गहू विक्रीस योग्य नसतो. कोणी घेतसुद्धा नाही. उभी पिके जमिनीवर लोळली असून पावसाने त्यांना लागलेल्या शेंगासुद्धा फुलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातील दाणे खराब होत आहेत. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांचे बुरे दिन आले आहेत.आंधळगाव : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रबी पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. आंधळगाव परिसरात पडलेल्या पावसाने गहू, हरभरा, लाखोरी, फळबाग यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धानपिक लावले. धानाचे उत्पादन झाले. मात्र भाव कमी असल्याने ते साठवून ठेवले तर काही शेतकऱ्यांनी मातीमोल भावात व्यापाऱ्यांना विकले. घोरपड येथील १२ एकराचे शेतकरी बाळू गावंडे यांनी धान पिकानंतर रब्बी पिक लावले. या चना, गहू, लाखोरी हे पिक आठ एकरात पेरले. मात्र आतापर्यंत सर्व काही ठीक असताना ऐन तोंडात पडलेले घास पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे नशिबातून गेले. शासनाने अगोदरच धानाचे भाव कमी केले व त्यावर भर घातलीया निसर्गाने. एकंदरीत झालेल्या पिकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. शेतातील उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली सापडला आहे.टोला येथील शेतकरी राजू माटे यांनी शेतात टमाटर, मिरची, कोबी, आंबा, संत्रा आदींची फळबाग ५ एकरात आहे. याला खर्च एकरी २० हजार आला असून या अवकाळी पावसाने उत्पादनात घट झाल्याने कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे बोलले.कृषी विभागाने व शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी आंधळगाव परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे. (वार्ताहर)