शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

पावसाने आले शेतकऱ्यांवर बुरे दिन; रबी पिकांची हानी

By admin | Updated: March 8, 2015 00:26 IST

अवकाळी पावसामुळे चौरास परिसरात मोठ्या प्रमाणावर रबी पिकांची हानी आलेली आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर ....

आसगाव (चौ.) : अवकाळी पावसामुळे चौरास परिसरात मोठ्या प्रमाणावर रबी पिकांची हानी आलेली आहे. पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर शेती पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रविवारला आलेल्या पावसाएवढा जोराचा होता की शेतातील सारे काम बंद पडले आहेत. या पावसाने मूग, उडीद, गहू, चणा, तूर, जवस धनिया ही पिके पावसाने पूर्णपणे भिजलेली आहेत. त्यांना सुकविता आले नाही तर या मालाला बुरशी लागून काळे पडत असतात. अशावेळी हा माल विक्रीसाठी योग्य नसते. तर पिकांवर पाणी गेल्यानंतर गव्हाचा रंग उतरतो व तो पांढरा होत असतो. त्यामुळे हा गहू विक्रीस योग्य नसतो. कोणी घेतसुद्धा नाही. उभी पिके जमिनीवर लोळली असून पावसाने त्यांना लागलेल्या शेंगासुद्धा फुलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातील दाणे खराब होत आहेत. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांचे बुरे दिन आले आहेत.आंधळगाव : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे रबी पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. आंधळगाव परिसरात पडलेल्या पावसाने गहू, हरभरा, लाखोरी, फळबाग यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धानपिक लावले. धानाचे उत्पादन झाले. मात्र भाव कमी असल्याने ते साठवून ठेवले तर काही शेतकऱ्यांनी मातीमोल भावात व्यापाऱ्यांना विकले. घोरपड येथील १२ एकराचे शेतकरी बाळू गावंडे यांनी धान पिकानंतर रब्बी पिक लावले. या चना, गहू, लाखोरी हे पिक आठ एकरात पेरले. मात्र आतापर्यंत सर्व काही ठीक असताना ऐन तोंडात पडलेले घास पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे नशिबातून गेले. शासनाने अगोदरच धानाचे भाव कमी केले व त्यावर भर घातलीया निसर्गाने. एकंदरीत झालेल्या पिकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. शेतातील उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त आल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली सापडला आहे.टोला येथील शेतकरी राजू माटे यांनी शेतात टमाटर, मिरची, कोबी, आंबा, संत्रा आदींची फळबाग ५ एकरात आहे. याला खर्च एकरी २० हजार आला असून या अवकाळी पावसाने उत्पादनात घट झाल्याने कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे बोलले.कृषी विभागाने व शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी आंधळगाव परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे. (वार्ताहर)