शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

गाेसेचे बॅक वाॅटर शिरले धान शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाेसे धरणाच्या पाणी पातळीत वाढ हाेताच अद्यापही संपादित न झालेल्या शेतशिवारात बॅक वाॅटर शिरुन हाताशी आलेले धान या पाण्यात बुडाले आहे. भंडारा आणि पवनी तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.गाेसे प्रकल्पासाठी संपादित न झालेल्या आणि बुडीत क्षेत्रालगत असलेल्या शेतजमीन संपादित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. गत पावसाळ्यापूर्वी या शेतजमिनीची माेजणी सुरु करण्यात आली हाेती, परंतु पावसाळ्यात शेतात भात पिकाची लागवड झाल्याने माेजणी करता आली नाही. आता गाेसे प्रकल्प विभागाने नवीन तारीख देऊन तत्काळ शेतजमिनीची माेजणी करावी अशी मागणी हाेत आहे.प्रकल्पाचे बॅक वाॅटर बेला, दवडीपार, काेरंभी, सालेबर्डी या व इतर भंडारा तालुक्यातील गावांसह पवनी तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात शिरले आहे. त्यात मदन माटे, याेकेश कुटे, मदन मिराशे, भगवान राखडे, लावाजी राखडे, रामकृष्ण वाट, विनाेद राखडे, शंकर मते, परमेश्वर मते, धनराज भाेयर, लक्ष्मण कुथे, भाऊराव राखडे आदींचा समावेश आहे. पाणी शेतात शिरल्याने तीन डीपी पाण्याखाली गेले आहेत. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन- बॅक वाॅटर शिरलेल्या शेताची तत्काळ पाहणी करुन शेतकऱ्यांना माेबदला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे, काेरभीचे उपसरपंच मनाेहर नागदेवे, दवडीपारचे रवी वाट, आकाश राखडे, संजय लांजेवार, राकेश तंबुलकर, सुनील राखडे, मनाेज दुबे, कुणाल राखडे, अमित हुमणे, सुमेध वासनिक आदी उपस्थित हाेते. यासाेबतच वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प