शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गाेसेचे बॅक वाॅटर शिरले धान शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाेसे धरणाच्या पाणी पातळीत वाढ हाेताच अद्यापही संपादित न झालेल्या शेतशिवारात बॅक वाॅटर शिरुन हाताशी आलेले धान या पाण्यात बुडाले आहे. भंडारा आणि पवनी तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.गाेसे प्रकल्पासाठी संपादित न झालेल्या आणि बुडीत क्षेत्रालगत असलेल्या शेतजमीन संपादित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. गत पावसाळ्यापूर्वी या शेतजमिनीची माेजणी सुरु करण्यात आली हाेती, परंतु पावसाळ्यात शेतात भात पिकाची लागवड झाल्याने माेजणी करता आली नाही. आता गाेसे प्रकल्प विभागाने नवीन तारीख देऊन तत्काळ शेतजमिनीची माेजणी करावी अशी मागणी हाेत आहे.प्रकल्पाचे बॅक वाॅटर बेला, दवडीपार, काेरंभी, सालेबर्डी या व इतर भंडारा तालुक्यातील गावांसह पवनी तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात शिरले आहे. त्यात मदन माटे, याेकेश कुटे, मदन मिराशे, भगवान राखडे, लावाजी राखडे, रामकृष्ण वाट, विनाेद राखडे, शंकर मते, परमेश्वर मते, धनराज भाेयर, लक्ष्मण कुथे, भाऊराव राखडे आदींचा समावेश आहे. पाणी शेतात शिरल्याने तीन डीपी पाण्याखाली गेले आहेत. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन- बॅक वाॅटर शिरलेल्या शेताची तत्काळ पाहणी करुन शेतकऱ्यांना माेबदला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे, काेरभीचे उपसरपंच मनाेहर नागदेवे, दवडीपारचे रवी वाट, आकाश राखडे, संजय लांजेवार, राकेश तंबुलकर, सुनील राखडे, मनाेज दुबे, कुणाल राखडे, अमित हुमणे, सुमेध वासनिक आदी उपस्थित हाेते. यासाेबतच वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प