शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

अलिखित शर्तींवर घेतले उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 01:05 IST

अड्याळला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामवासीयांनी आधी साखळी व नंतर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यात देवराम तलमले, मन्साराम वंजारी, हरिशचंद्र वासनिक, सचिनराव हिंगे या चारही ज्येष्ठ उपोषणकर्ते व अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती तथा उपस्थित ग्रामस्थांनी अटीतटीच्या अलिखित शर्तीवर सहाव्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले.

ठळक मुद्देमतदानावर बहिष्कार कायम : प्रकरण अड्याळ तालुका निर्मितीचे

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामवासीयांनी आधी साखळी व नंतर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यात देवराम तलमले, मन्साराम वंजारी, हरिशचंद्र वासनिक, सचिनराव हिंगे या चारही ज्येष्ठ उपोषणकर्ते व अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती तथा उपस्थित ग्रामस्थांनी अटीतटीच्या अलिखित शर्तीवर सहाव्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले.उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, तहसीलदार गजानन कोकुर्डे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, ठाणेदार सुरेश ढोबळे अड्याळ, अड्याळ तालुका निर्मितीकृती संघर्ष समितीचे पदाधिकारी, धनंजय दलाल, युवराज वासनिक, डॉ. उल्हास हरडे, अतुल मुलकलवार, देवेंद्र हजारे, मधु गभणे, भारतभुषण वासनिक, डॉ. हर्षवर्धन कोहपरे, राजु मुरकुटे, नंदलाल मेश्राम, बालक गजभिये, राजेंद्र ब्राम्हणकर आदी व समस्त ग्रामस्थ आणि राजकीय पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.२०१६ पर्यंतचा अहवाल, अड्याळ तालुका निर्मिती संबंधित अहवाल पाठविला आहे. येणाऱ्या चार दिवसात हा अहवाल अद्यावत करुन शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी घेतली. पंरतु या आधी चार जिल्हाधिकारी व आयुक्त असे एकुण पाच अहवाल शासनाकडेच पाठविण्यात आले होते. मग त्या अहवालाचे काय झाले? याबाबत प्रश्न विचारण्यात आले.अहवाल शासनाकडे गेल्यावर त्यावर किती दिवसात विचार व्हायला पाहिजे हे ग्रामस्थांना माहित नसले तरी चार ते पाच अहवाल याआधी शासनाकडे अड्याळ तालुका निर्मिती संदर्भात गेले. त्यावर मात्र आजपावेतो निर्णय का घेण्यात आले नाही, याचाही उहापोह झाला.यावेळी जिल्ह्यातील तथा पवनी तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. अड्याळ तालुका निर्मिती संदर्भात सर्वपक्षीय नेते मंडळीनी मदत करण्याचे ठरविले.अधिकाराच्या व उपस्थित नेते मंडळीच्या शब्दावर विश्वास ठेवून आमरण उपोषण मागे घेत असल्याचे यावेळी आमरण उपोषणकर्त्यांनी आपले मत मांडले.सदर आमरण उपोषण मंडपाच्या समोर ग्रामस्थांच्या रोषालाही नेते मंडळीना सामोरे जावे लागले. परंतु दिलेले आश्वासन गेली ३० वर्षाच्या काळात कुणीही पुर्ण करु शकले नाही. आमरण उपोषण सुटले असले तरी अजुनपर्यंत अड्याळ तालुका निर्मितीचे मिशन पुर्ण झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडण्ुाकीवर ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतलेल्या ठरावानुसार मतदानावर अड्याळ ग्रामवासी बहिष्कार घालणार आहेत अशी माहिती सुध्दा यावेळी देण्यात आली.शेवटी उपोषण सुटले ग्रामीण रुग्णालयातचार पैकी एकाला चवथ्या दिवशी ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे देवराम तलमले यांना भरती करण्यात आले होते. आमरण उपोषण मंडपासमोर चर्चा झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांचा तथा अधिकारी व लहान मोठ्या नेते मंडळीचा ताफा ग्रामीण रुग्णालयात पोहचताच तिथे गर्दीच गर्दी झाली होती. यावेळी तिघांना सुध्दा ईथे आणण्यात आले होते. परंतु आमरण उपोषण कर्ते सर्वांनी समज दिल्यावरही उपोषण सोडायला तयार नव्हते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार काही वेळ थांबुन परत गेले.उपोषण सोडायला तयार झाले तेव्हा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना अर्ध्या रस्त्यातून पुन्हा ग्रामीण रुग्णालयात येवून चर्चा केली व आमरण उपोषणकर्त्यांना उपस्थित अधिकारी व राजकीय पक्ष नेतेमंडळीनी लिंबू पाणी पाजून आमरण उपोषण सोडविले.

टॅग्स :Strikeसंप