शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाबा जुमदेव यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी स्वतःला वाहून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

भंडारा : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी व्यसनमुक्त समाज घडविला. यासाठी त्यांनी समाजातील व्यसनाधिन, तणावग्रस्त पीडित जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढत ...

भंडारा : महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी व्यसनमुक्त समाज घडविला. यासाठी त्यांनी समाजातील व्यसनाधिन, तणावग्रस्त पीडित जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढत त्यांनी सर्वसामान्यांना दुःख निवारणाचा मार्ग दाखविला. यासोबतच त्यांनी समाजात असलेली अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यामुळेच आज अनेक कुटुंबे सुखाने जगत आहेत, असे प्रतिपादन खरबी नाका येथील उपसरपंच तथा परमात्मा एकचे सेवक संजय आकरे यांनी केले.

भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या १००व्या जयंती निमित्त परमात्मा एक सेवक मंडळ शाखा खरबी नाकाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी कार्यकर्ता गजानन धावडे, उपाध्यक्ष नंदलाल जौंजाळ, सहदेव धावडे, रसपाल कांबळे, दिगंबर धावडे, ओमन मोथरकर, मनोज गिरिपुंजे, मोरेश्वर हटवार, दिपाली आकरे, ममता धांडे, शशिकला मोथरकर, रुक्माबाई धांडे, छबुबाई जौंजाळ, पुष्पकला धावडे, गावातील बालगोपाल, परमात्मा एक सेवक मंडळाचे पदाधिकारी, तसेच इतर सेवक उपस्थित होते. यावेळी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने ओमन मोथरकर यांच्या घरी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना सर्वानुमते अभिवादन करण्यात आले.

यावेळी रसपाल कांबळे यांनी मार्गदर्शनात बाबा जुमदेवजी यांनी तणावग्रस्त पीडित जनतेला दुःख निवारणाचा मार्ग दाखविला, असे सांगून समाजातील अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्याचे कामही केले असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांनी बाबा जुमदेवजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

उपसरपंच संजय आकरे यांनी बाबा जुमदेवजी यांची जयंती सलग दोन वर्षे साजरी करता आली नसली, तरी बाबांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल करीत त्यांचे तत्त्व, शब्द, नियम यांचे पालन करून माणुसकीचा धर्म पुढे नेण्याचे आवाहन केले. जयंती निमित्ताने कोरोनाचे संकट टळावे व पुढील वर्षी १०१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याविषयी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी गजानन ढवळे यांनी बाबा जुमदेवजी यांनी तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती केली, तसेच त्यानंतर त्यांनी समाजातील सर्वांना सोबत घेऊन कार्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी सेवकांना भेदभाव न करता कार्य करण्याचे आवाहन केले. ते कार्य आजही सुरू असल्याने, सर्वसामान्यांना या विचारांचा फायदा होत असल्याचे सांगितले. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्यात आले.