शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रेल्वे सुरक्षा विभागाचे जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

दिवसेंदिवस रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. रेल्वे रुळावर बेफिकीर वावरणाऱ्या परिसरातील नागरिकांचा यात हकनाक बळी जात आहे. ...

दिवसेंदिवस रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. रेल्वे रुळावर बेफिकीर वावरणाऱ्या परिसरातील नागरिकांचा यात हकनाक बळी जात आहे. रेल्वे रुळावर फिरायला जाणे व रेल्वे रुळावर बसून टवाळक्या करण्याच्या वाढत्या प्रकारामुळे जीवहानी सारख्या घटना वाढल्या आहेत. याबरोबर धावत्या रेल्वे गाड्यावर कुतूहल म्हणून होणारी दगडफेक प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. रेल्वे रुळाच्या नजीक असलेल्या वस्त्यातील काही टवाळखोर धावत्या रेल्वेवर दगडफेक करून प्रवाशांचे मोबाइल लंपास करीत असल्याचे घटना वाढल्या आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागाकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चूघ यांच्या संकल्पनेतून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. रेल्वे लगतच्या परिसरातील नागरिकांनी जीवहानी टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक एस. दत्ता यांनी केले. यावेळी उपनिरीक्षक दीपक कुमार, सहायक उपनिरीक्षक ओ. सी. शेंडे, पाहुणीचे सरपंच हरिभाऊ धुर्वे, लावेश्वरचे सरपंच अर्चना गणेश काळे उपस्थित होते.

210721\img-20210721-wa0080.jpg

नागरिकांना अपघात टाळण्यासाठी माहिती देताना सुरक्षा दलाचे अधिकारी