शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जलयुक्त शिवार अभियानात योगदान देणाऱ्या गावांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 00:30 IST

जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा, तालुका व गावांना राज्यस्तर, विभागस्तर ...

भंडारा : जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा, तालुका व गावांना राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे, लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर करण्यास ग्रामस्थांना प्रोत्साहित करणे, शासनाच्या योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे जिल्हे, तालुके, गावे या पुरस्कारांसाठी पात्र ठरतील. राज्य स्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी हे पुरस्कार दिले जातील. जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम करणारी पाच गावे व दोन तालुक्यांना जिल्हास्तरावर दोन गावे, दोन तालुके व दोन जिल्ह्यांना विभागस्तरावर तर तीन गावे तीन तालुके व तीन जिल्ह्यांना राज्यस्तरावर हे पुरस्कार दिले जाईल. उत्कृष्ट लिखाणाने जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांना राज्य, विभाग व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासन निर्णय झाला आहे. जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणरे पत्रकार आणि जलयक्त शिवार अभियानाची त्या त्या परिसरात जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटांच्या यशोगाथा प्रकाशित करणे इतर गावांना प्रोत्साहित करून पाणीप्रश्न सोडविण्यात योगदान देणारे पत्रकार या पुरस्कारासाठी पात्र राहणार आहेत. (शहर प्रतिनिधी)असे असतील पुरस्कारराज्यस्तरावरील पुरस्कारांसाठी निवडलेल्या गावांसाठी प्रथम पुरस्कार २५ लाख, द्वितीय १५ लाख, तृतीय ७.५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असा आहे. तालुक्यांसाठी पुरस्काराची रक्कम प्रथाम क्रमांक ३५ लाख, द्वितीय २० लाख, तृतीय १० लाख रुपये, स्मृतीचिन्ह असा आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक ५० लाख, द्वितीय ३० लाख, तृतीय १५ लाख रूपये व स्मृतिचिन्ह असे आहे.