शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

कर्मकांड टाळत संविधानाला वंदन करून गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:52 IST

ना सत्यनारायणाची पूजा, ना कोणते कर्मकांड. जिजाऊ राजमाता, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबांचे अभंग आणि भारतीय संविधानाला त्रिवार वंदन करीत एका कुटुंबाने गृहप्रवेश केला. कर्मकांडाला फाटा देत उचललेले हे प्रेरणादायी पाऊल सध्या तुमसर शहरात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. ही आगळीवेगळी गृहप्रवेशाची संकल्पना राबविली अनिल भुसारी आणि शीतल भुसारी या शिक्षक दांपत्याने.

ठळक मुद्देप्रेरणादायी पाऊल : आईवडिलांच्या हस्ते कापली फित, भुसारी दाम्पत्याचा अभिनव उपक्रम

राहूल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ना सत्यनारायणाची पूजा, ना कोणते कर्मकांड. जिजाऊ राजमाता, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबांचे अभंग आणि भारतीय संविधानाला त्रिवार वंदन करीत एका कुटुंबाने गृहप्रवेश केला. कर्मकांडाला फाटा देत उचललेले हे प्रेरणादायी पाऊल सध्या तुमसर शहरात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. ही आगळीवेगळी गृहप्रवेशाची संकल्पना राबविली अनिल भुसारी आणि शीतल भुसारी या शिक्षक दांपत्याने.प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नातील घर असते. घर बांधण्यासाठी आटापीटा केला जातो. आयुष्याची अर्धी अधिक पूंजी या घरावर खर्ची घातली जाते. वैज्ञानिक आधार घेत घराचे बांधकामही केले जाते. मात्र गृहप्रवेश आला की मग डोक्यात शिरतात ते कर्मकांड. सत्यनारायण, वास्तूशांती, होमहवन आदी धार्मीक उत्सव केले जातात. उच्चशिक्षिताने बांधलेल्या घरीही असे कर्मकांड होण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येतात. परंतु या सर्व बाबीला एका पुरोगामी विचाराच्या शिक्षक दांपत्याने फाटा दिला. मन, मेंदू आणि मस्तक यांना गहाण न ठेवता त्यांनी पुरोगामी विचारातून आईबाबांच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश केला.भुसारी परिवार हा मोहाडी तालुक्यातील खैरलांजी येथील रहिवासी. तुमसर येथे नोकरीच्या निमित्ताने त्यांचा निवास. या ठिकाणी त्यांनी आपले घर बांधले. या घराच्या गृहप्रवेशासाठी त्यांनी निर्माण केलेला पायंडा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. याठिकाणी राजमाता जिजाऊ, शिवधर्म गाथा, ग्रामगीता, तुकोबाचे अभंग आणि भारतीय संविधानाला वंदन करून घरात प्रवेश केला. हा सोहळा अनुभवण्यासाठी तुमसरकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल डोंगरे व चंद्रकांत लांजेवार यांनी शिवधर्म गाथेचे वाचन व तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले. अभंगांचे अर्थही स्पष्ट केले. आनंददायी जीवन जगण्याचा संदेश केदार नाकाडे यांनी दिला. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि पुरोगामी विचार स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.