शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपन्यांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे ...

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन सात कोटी ४२ लाख रुपयांची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली होती. मात्र, खरीप हंगामात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होऊनही अद्याप यातील हजारो शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून मदत मिळालीच नसल्याचे वास्तव आहे. सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मदतीसाठी पीकविमा कंपन्यांनी हात वर केले असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकीकडे पीककर्ज भरण्याची शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे अद्यापही विमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

कोट

धान पीक कापणीला येताच तुडतुडा रोगाने आक्रमण केले. यात तीन एकरांतील धान जागेवरच नष्ट झाले. त्यानंतर कृषी साहाय्यक, तलाठी, विमा प्रतिनिधीने येऊन पाहणी केली. मात्र, आता विमा प्रतिनिधीला फोन केला तरी अद्याप मला मदत मिळाली नाही. प्रशासनाने लक्ष घालून मला न्याय द्यावा.

सुरेश गिरीपुंजे,

शेतकरी, खरबी नाका