शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नुकसानभरपाईसाठी पीक विमा कंपनीची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ ...

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन सात कोटी ४२ लाख रुपयांची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली होती. मात्र, खरीप हंगामात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊनही अद्याप यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मदत मिळालीच नसल्याचे वास्तव आहे. सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मदतीसाठी पीक विमा कंपनीने हात वर केले असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकीकडे पीक कर्ज भरण्याची शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे अद्यापही विमा कंपनीकडून मदत मिळाली नसल्याने पीककर्ज अशा दुहेरी संकटात सापडले आहेत.

बॉक्स

तीन एकरातील धान पीक उद्‌ध्वस्त होऊनही विमा कंपनीने हात वर केले

भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथील सुरेश गिरीपुंजे यांच्या शेतातील चार एकर धान पीक तुडतुडा पिकाने उद्‌ध्वस्त केले होते. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, सोसायटीचे प्रतिनिधी, पीक विमा प्रतिनिधी, गावचे उपसरपंच यांनी पाहणी केली होती. त्यानंतर विमा कंपनीकडून मदत मिळेल अशी आशा होती. मात्र, वारंवार फोन करूनही विमा प्रतिनिधींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी विमा कंपनीमुळे त्रस्त झाले आहेत. फक्त भंडारा तालुक्यातच नव्हे तर पवनी, लाखांदूर, तुमसर तालुक्यातही हजारो शेतकरी आजही पीक विमा मदतीपासून वंचित आहेत. शेतकरी अनेकदा विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन करतात. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बॉक्स

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपनीच्या फायद्यासाठी

दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र शासनाने खरीप आणि रबी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविली. जिल्ह्यात १ लाख ८३ हजार ४०१ शेतकरी खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, त्या तुलनेत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की पीक विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणीही होत आहे. याशिवाय जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विमा प्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज आहे.

कोट

धान पीक कापणीला येताच तुडतुडा रोगाने आक्रमण केले. यात तीन एकरांतील धान जागेवरच नष्ट झाले. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, विमा प्रतिनिधीने येऊन पाहणी केली. मात्र, आता विमा प्रतिनिधीला फोन केला तरी अद्याप मला मदत मिळाली नाही. प्रशासनाने लक्ष घालून मला न्याय द्यावा.

सुरेश गिरीपुंजे,

शेतकरी, खरबी नाका.