शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

नुकसानभरपाईसाठी पीक विमा कंपनीची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ ...

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन सात कोटी ४२ लाख रुपयांची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली होती. मात्र, खरीप हंगामात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊनही अद्याप यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मदत मिळालीच नसल्याचे वास्तव आहे. सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मदतीसाठी पीक विमा कंपनीने हात वर केले असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकीकडे पीक कर्ज भरण्याची शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे अद्यापही विमा कंपनीकडून मदत मिळाली नसल्याने पीककर्ज अशा दुहेरी संकटात सापडले आहेत.

बॉक्स

तीन एकरातील धान पीक उद्‌ध्वस्त होऊनही विमा कंपनीने हात वर केले

भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथील सुरेश गिरीपुंजे यांच्या शेतातील चार एकर धान पीक तुडतुडा पिकाने उद्‌ध्वस्त केले होते. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, सोसायटीचे प्रतिनिधी, पीक विमा प्रतिनिधी, गावचे उपसरपंच यांनी पाहणी केली होती. त्यानंतर विमा कंपनीकडून मदत मिळेल अशी आशा होती. मात्र, वारंवार फोन करूनही विमा प्रतिनिधींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी विमा कंपनीमुळे त्रस्त झाले आहेत. फक्त भंडारा तालुक्यातच नव्हे तर पवनी, लाखांदूर, तुमसर तालुक्यातही हजारो शेतकरी आजही पीक विमा मदतीपासून वंचित आहेत. शेतकरी अनेकदा विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन करतात. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बॉक्स

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपनीच्या फायद्यासाठी

दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र शासनाने खरीप आणि रबी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविली. जिल्ह्यात १ लाख ८३ हजार ४०१ शेतकरी खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, त्या तुलनेत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की पीक विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणीही होत आहे. याशिवाय जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विमा प्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज आहे.

कोट

धान पीक कापणीला येताच तुडतुडा रोगाने आक्रमण केले. यात तीन एकरांतील धान जागेवरच नष्ट झाले. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, विमा प्रतिनिधीने येऊन पाहणी केली. मात्र, आता विमा प्रतिनिधीला फोन केला तरी अद्याप मला मदत मिळाली नाही. प्रशासनाने लक्ष घालून मला न्याय द्यावा.

सुरेश गिरीपुंजे,

शेतकरी, खरबी नाका.