शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विषयाच्या अनुपालनासाठी अधिकाऱ्यांकडे वेळच नाही

By admin | Updated: March 19, 2017 00:21 IST

जनता दरबारात आपले प्रश्न सुटतील या आशेने आलेल्या तक्रारकर्त्यांचे विषय अधिकाऱ्यांनी फाईलीत गुंडाळून ठेवले आहेत.

जनतेचे प्रश्न तसेच पडून : अधिकारी गंभीर नाहीत, कार्यकर्त्यांनी घेतला आढावामोहाडी : जनता दरबारात आपले प्रश्न सुटतील या आशेने आलेल्या तक्रारकर्त्यांचे विषय अधिकाऱ्यांनी फाईलीत गुंडाळून ठेवले आहेत. खासदार नाना पटोले यांनी सात दिवसात अनुपालन झाले पाहिजे असे निर्देश जनता दरबारात दिले होते. तथापि अर्धा महिना उलटूनही अधिकाऱ्यांनी जनता दरबारात आलेले विषय गांभीर्याने घेतले नसल्याची बाब कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आढाव्यात उघडकीस आली आहे.प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवित नाही. उलट त्या प्रश्नांचा गुंता कायम कसा राहील याचा अधिक विचार करतात. लहान लहान प्रश्न मार्गी लावण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना आनंद येतो. त्यामुळे जनता अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर संताप कशी व्यक्त करते याचा वास्तविक अनुभव मोहाडी येथील जनता दरबारात दिसून आला. जनता दरबारात संतापलेल्या सामान्य जनतेच्या सहनशिलतेची आता मर्यादा पार झाल्याचे दिसून आले. मोहाडी येथील जनता दरबारात सर्वात जास्त तक्रारी महसूल विभागाच्या आहेत. तब्बल १३५ तक्रारी आल्याची नोंद आहे. विद्युत विभाग १०, सार्वजनिक बांधकाम विभाग ५, नगरपंचायत ११, पंचायत समिती ४५, तालुका कृषी विभाग २, आरोग्य विभाग ५, बावनथडी प्रकल्प ६, पाटबंधारे विभाग १, वनपरिक्षेत्र कांद्री - तुमसर ९, भूमी अभिलेख ७, सहाय्यक निबंधक ५ अशा तक्रारी आल्याची नोंद करण्यात आली आहे. आलेल्या तक्रारीपैकी केवळ विद्युत विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रारीचे निरसन करून अनुपालन अहवाल तहसीलदार मोहाडी यांच्याकडे पाठविला आहे. उर्वरित दहा विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारीचा निपटारा करून अनुपालन अहवाल संबंधितांकडे पाठविण्याची वेळच नाही असे दिसून येते. किंबहुना जनता दरबारातील उपस्थित विषयासंबंधी गांभीर्य नाही हे लक्षात येते. महसूल विभागाचे तालुक्याचे सर्वेसर्वा तहसीलदार धनंजय देशमुख यांनी तर आपल्या विभागाचे कोणते प्रश्न आहेत यावर नजरही फिरविली नसल्याचे दिसून आले. आधी मार्च एंडींग, जिल्हा प्रशासनाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठीच वेळ नाही असे तहसीलदार सांगतात. यावरून तहसीलदार जनता दरबारातील विषयांना हलक्यात घेतले आहे असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ मार्च पर्यंत अनुपालन अहवाल तहसीलदार यांच्याकडे देणे अपेक्षित होते. परंतु तसे घडलेले नाही. जनता दरबारातील विषयाच्या अनुपालनासंबंधी माहिती घेण्यास खासदार नाना पटोले यांचे नेमलेले कार्यकर्ते गजानन झंझाड, खुशाल कोसरे, ज्योतिष नंदनवार तहसीलदार यांच्याकडे १६ मार्च रोजी गेले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या आढाव्यात सगळे विषय अधिकाऱ्यांनी फाईलमध्ये गुंडाळून ठेवलेले आहेत असे निदर्शनास आले आहे. जनता दरबारात महसूल विभागाचे प्रश्नात फेरफार, सरकारी पट्टे, अतिक्रमणातील पट्टे, वहिवाटी रस्ता, पांदन रस्ता, आबादी प्लॉट, अन्नसुरक्षा योजनेत घोळ, झुडपी जंगल आदी विषयांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या विभागात घरकुल, शौचालय बांधकाम रोजगार हमी योजना या विषयाचा समावेश आहे. सावकारांकडून दागिने परत न मिळण्याबाबत, ग्रामीण रुग्णालयांच्या समस्या, बावनथडी जमिनीचा मोबदला, वन्यप्राण्यांचा हैदोस आदी महत्वाचे प्रश्न तक्रारकर्त्यांनी मोठ्या अपेक्षेने जनता दरबारात मांडले होते. आपसात तक्रारकर्ते, आमच्या तक्रारीचे कार्य झाले असा प्रश्न एकमेकांना विचारीत आहेत. जनता दरबार असो की आमसभा यातील आलेले विषय गंभीरतेने घ्यायचे नसतात, असा समाज अधिकाऱ्यांनी करून घेतला आहे. वेळ मारून नेण्याची कला अवगत असणारे अधिकारी आमचे काही होत नाही या बेफिकरी भावनेने कर्तव्य बजावत आहेत. याच कारणामुळे अधिकाऱ्यांवर सोबतच जनप्रतिनिधींवर सामान्य जनता अविश्वासाचा ठपका ठेवत असतात. मोहाडीत जनता दरबाराला दोन आठवडे उलटून गेले. तरीही प्रशासनात काम करणारे अधिकारी जनता दरबारातील विषय संदर्भात अजिबात गांभीर्य नाहीत हेच दिसून आले आहे. जनता दरबारातील विषयांचे अनुपालन काय झाले याविषयी तहसीलदार मोहाडी यांना विचारले असता आधी महसूल विभागाने दिलेला लक्षांक गाढायचा आहे. असे उत्तर आले. ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी अनुपालन अहवाल पाठविण्याची दिरंगाई केली, अहवाल पाठविला नाही याबाबत त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)जनता दरबारातील तक्रारी संबंधात ज्या विभागांनी अनुपालन अहवाल पाठविले नाही त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अहवाल तात्काळ पाठवावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना सूचित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.-धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.