शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

बाबासाहेबांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 28, 2016 00:24 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

रामदास आठवले : भारत-भीमयात्राचे स्वागतभंडारा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांनी समाजव्यवस्था जोडली आहे. ‘जाती तोडो - भारत जोडो’ हा समता संदेश घेऊनच भारत भीमयात्रा देशभरात फिरत आहे. या यात्रेमधून माणसाला माणसाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले. यावेळी खा.आठवले म्हणाले, आम्ही भाजपाला साथ दिली याचा अर्थ आम्ही भाजपचा ‘अजेंडा’ चालवितो, असे नाही. ही राजकीय युती आहे. भविष्यात आम्ही पक्षासोबत राहूच असेही नाही. आमचा पक्ष निळ्या झेंडा घेऊन जात आहे. प्रधानमंत्री मोदी यांची भूमिका योग्य आहे. दलित समाजाच्या आरक्षणाला कुणीही हात लावत नाही. ज्यांना आरक्षण नाही, असे महाराष्ट्रातील मराठा, गुजराततेतील पटेल, राजस्थानातील राजपुत आणि हरियाणातील जाट समुदायाला आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी आपण संसदेत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समतेचे विचार आहे, आणि याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही भारत भीमयात्रेला सुरुवात केली आहे. २६ जानेवारीला कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा २८ हजार किलोमीटरचे अंतर कापत बुधवारला भंडाऱ्यात आली आहे. या यात्रेचा समारोप १ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू या ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ) भंडारा जिल्ह्याच्यावतीने बुधवारला दुपारी त्रिमूर्ती चौकात भारत भीम यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा छत्तीसगड राज्यातील राजनांदगावकडे रवाना झाली. यावेळी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, रिपाई (आ)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, दयाल बहादुरे, म.दा. भोवते, बोरकर, अमृत बन्सोड, आसीत बागडे, भाजपचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, मयुर बिसेन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)