शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सौंदड येथील ग्रामस्थांवरील हल्ला हा संघटित आणि पूर्वनियोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:49 IST

अड्याळ (सौंदड) पुनर्वसन येथे गो तस्कराकडून सौंदड पुनर्वसन येथील शेतकरी, शेतमजुरांवर केलेला हा हल्ला संघटित असून पुर्वनियोजित होता असा आरोप करून जिल्ह्यात पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे अवैध व्यवसाय फोफावले आहेत. अड्याळ येथे छत्तीसगढ व मध्यप्रदेश राज्यातून गायी आणून अन्य ट्रकद्वारे आंध्रप्रदेश, तेलंगाणा व अन्य राज्यामध्ये तस्करी करण्याचा व्यवसाय कित्येक वर्षापासून सुरू आहे.

ठळक मुद्देसंघर्ष समितीचा आरोप : ठाणेदार किचक यांना निलंबित करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अड्याळ (सौंदड) पुनर्वसन येथे गो तस्कराकडून सौंदड पुनर्वसन येथील शेतकरी, शेतमजुरांवर केलेला हा हल्ला संघटित असून पुर्वनियोजित होता असा आरोप करून जिल्ह्यात पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे अवैध व्यवसाय फोफावले आहेत. अड्याळ येथे छत्तीसगढ व मध्यप्रदेश राज्यातून गायी आणून अन्य ट्रकद्वारे आंध्रप्रदेश, तेलंगाणा व अन्य राज्यामध्ये तस्करी करण्याचा व्यवसाय कित्येक वर्षापासून सुरू आहे. परिसरातील लोकांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. त्यामुळे गो तस्करांची हिम्मत वाढत असू या मारहाण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीअन्यायग्रस्त गो-तस्कर हल्ला पीडित संघर्ष समितीने केली आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, डॉ.संजय एकापुरे, प्रदीप गजभिये, विजय निंबार्ते, जगदीश भुते, मनोज गजभिये, आदेश तितीरमारे, संदीप भुते, प्रमोद देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, घटनेच्या दिवशी ७ जुलैला गोतस्करांनी रस्त्यावर ट्रक आडवा लावून तस्करी करूण आणलेल्या गायी बैलांना दुसऱ्या ट्रकमध्ये चढवित होते. गोतस्करांना रस्त्यावरून ट्रक हटविण्याची विनंती केली असता १० ते १२ गो तस्करांनी पुरूषोत्तम केवट (६५) याला लाठ्या काठ्यांनी मारहान केली. या वयोवृद्ध शेतकºयांला वाचविण्यासाठी गावातील अन्य शेतकरी शेतमजुर धावून आले. तेव्हा त्या गोतस्करांनी भारत मेश्राम, सोमा निंबार्ते, चंद्रभान भुते यांनाही मारहाण केली. गावात घुसून हल्ला करण्याची धमकी दिली. लाठ्या काठ्या घेऊन उभे असलेले गो तस्कर व पोलिसांची साथ मिळत नसल्याचे पाहुन गरीब शेतमजुर घरी पळत आले व घाबरून घरात बंद करून घेतले.त्यानंतर या गोतस्करांनी फोनवर संपर्क साधून बाहेरून बोलविलेल्या २५ ते ३० साथीदारांनी घरावर हल्ला केला. दार तोडून घरात शिरले. लोखंडी रॉड व काठ्यांनी अमानुष पद्धतीने वार करत सुटले. यात अनिता गोपाल निंबार्ते ही महिला ८ महिन्याच्या मुलाला दुध पाजत होती. या हल्लेखोरांनी त्या मुलाला उचलून बाजुला फेकले व त्या महिलेची छेडखानी केली. असाच प्रकार चंद्रभान भुते (५५) या व्यक्तीवर झाला. तीन हल्लाखोराने नालीवर पाडून लोखंडी रॉडने त्याच्या पायावर वार केला त्यामुळे त्याचा पाय मोडला. हा वयोवृद्ध शेतमजुर पायावर पुन्हा उभा राहू शकणार नाही. भारत मेश्राम, आदेश तितीरमारे, आभय भुते, जितेंद्र भुते, पुनेश्वर भुते यांच्यावर गो तस्करांनी हल्ले केले. परंतु सुचना देऊनही पोलीस आले नाही.७ जुलैच्या रात्री एकत्रित झालेल्या जमावामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हे सारे न्याय मागण्यासाठी आले होते. ते हल्लेखोरांवर कार्यवाही करण्याची मागणी करीत होते. परंतु तेथे ही पोलिसांनी चालढकल केली व एकत्रित जमावाला पांगविण्यासाठी दंडूकेशाहीचा आधार घेतला व त्यात अनेकजण जखमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ७ जुलैच्या रात्री पोलीस ठाण्यासमोर जमावावर लाठी चार्ज केला नाही, असे सांगितले. परंतु या लाठी हल्ल्यात गुणवंत नागुलकर व इतर १० ते १२ व्यक्तींच्या शरीरावर आलेले व्रण कुठल्या हल्याचे आहेत, हे पोलिसांनी सांगावे, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.घटनेच्या सहा दिवसानंतरही बाबू पटेल, जाबू शेख, कमलेश जाधव हे तीन मुख्य आरोपी पोलिसांना गवसले नाही. जिल्हा पोलिसांनी शोध मोहिम राबवून तीन फरार आरोपींना अटक केली पाहिजे. गो तस्करातील हल्लेखोराविरूद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करणे, प्रकरणातील फरार आरोपी कडून सौंदड पुनर्वसन गावावर हल्ला करण्याची भिती असल्यामुळे तेथे २४ तास सशस्त्र पोलीस पहारा प्रधान करण्यात यावा, या हल्ल्यात जखमी झालेल्या व विकलांग झालेल्या शेतकºयांच्या परिवारास दोन लक्ष रूपयांचे आर्थिक साहयता व उपचारांचा संपूर्ण खर्च सरकारने द्यावा, गुन्हेगारांवर ३०७ कलम लावण्यात यावे, गावामध्ये चालत असलेले गो तस्करांच्या अड्याविरोधात कार्यवाही करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.