शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिवसेनेचा पालिकेवर हल्लाबोल

By admin | Updated: July 16, 2016 00:40 IST

भंडारा : पिण्याचे स्वच्छ पाणी, वॉर्डात पक्के रस्ते, रस्त्यांची डागडूजी तथा घनकचरा व्यवस्थापनाची समस्या मार्गी लावाव्यात...

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : आठ दिवसांचा अल्टीमेटम भंडारा : पिण्याचे स्वच्छ पाणी, वॉर्डात पक्के रस्ते, रस्त्यांची डागडूजी तथा घनकचरा व्यवस्थापनाची समस्या मार्गी लावाव्यात या मागणीला घेवून शिवसेनेने आज भंडारा नगरपालिकेवर हल्लाबोल्ल केला. यात माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात पालिका मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भंडारा शहरात पिण्याचे पाणी, स्वच्छता, अतिक्रमण, रस्त्यांची डागडूजी, नाल्यांची बांधणी यासह अन्य समस्या अजूनही कायम आहे. वारंवार सांगूनही या समस्या निकाली निघालेल्या नाही. दूषित पाण्याची समस्या ही नागरिकांचा जिवावर बेतणारी असली तरी पालिका प्रशासनाला गांभीर्य नाही. रस्ते, नाल्यांची समस्या ही सोडविली जात नाही. जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालय बांधकामाचा प्रस्ताव भंडारा शहरात विचाराधीन असतांना लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करित आहेत. तसेच भाजीपाला मार्केटसाठी अल्पशा मोबदल्यात एका खाजगी कंपनीला जलशुध्दीकरण केंद्रालगतची जागा देण्यात आली होती. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने पालकमंत्री यांनी दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम स्थगितीबाबत आदेश दिले. शहरातील बगिच्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील मागास भागात राहणाऱ्या नागरिकांना नझुलचे पट्टे देण्यात आले नाही. शहरात सौंदर्यीकरणाची कामे प्रलंबित आहेत. यासर्व समस्यांना घेवून आज सकाळी ११ वाजता पालिकेवर शिवसेनेने हल्लाबोल्ल केला. यात समस्येच्या निवारण्यात आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने, नितीन साकुरे, ललित बोंद्रे, यशवंत सोनकुसरे, विशाल लांजेवार, आकाश जनबंधु, कैलास तांडेकर, पंकज दहिकर, मयुर लांजेवार, बाबा तांडेकर, सुधिर उरकुडे, दिपक डोकरीमारे, ईश्वर टाले, जग्गू हजारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)