शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकऱ्यांचा नहरावर हल्लाबोल

By admin | Updated: September 16, 2015 01:18 IST

इटियाडोह पाटबंधारे विभागाचे पाणी लाखांदूर तालुक्याला मिळत नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी मुख्य नहरावर हल्लाबोल केला.

चर्चा न करताच अभियंते परतले : शेतकऱ्यांचा पाणी चोरीचा अभियंत्यावर आरोप लाखांदूर : इटियाडोह पाटबंधारे विभागाचे पाणी लाखांदूर तालुक्याला मिळत नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी मुख्य नहरावर हल्लाबोल केला. लाखांदूरचे पाणी गडचिरोली जिल्ह्यात देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करताच उपविभागीय अभियंत्यासोबत शाखा अभियंता हे चर्चा न करताच परतल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनीच नहराचे गेट उघडून पाणी सुरु केले.इटियाडोह पाटबंधारे विभागाचे पाणी भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचित करते. यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा धरणाच्या पाण्याकडे वळविला. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील अभियंते लाखांदूर तालुक्यातील नहराचे गेट बंद केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर मुख्य नहरावरच वडसा, वडेगाव, लाखांदूर, आरमोरी व कोरंभी येथील अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी हल्लाबोल केला. दरम्यान वडसा येथील उपविभागीय अभियंता गोहाटे व शाखा अभियंता टी.के. मेंढे यांनी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून चर्चा न करताच तिथून पळ काढला.इटियाडोह धरणाचा मुख्य कालव्यातून मुख्यत: ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याची क्षमता असताना तेवढेच पाणी कालव्याद्वारे सुरु आहे. सर्वाधिक पाण्याचा वापर गोठणगाव व अर्जुनी (मोरगाव) तालुक्यात होत असल्यामुळे लाखांदूर व वडसा-आरमोरी तालुक्याला पाण्याचा पुरेपूर पुरवठा होत नाही. या पाटबंधारे विभागाअंतर्गत ५५ पाणी वापर सहकारी संस्था तयार करण्यात आले आहेत. यापैकी लाखांदूर शाखेंतर्गत आठ व बारव्हा शाखेअंतर्गत चार पाणी वापर सहकार संस्थेंतर्गत पाण्याचे नियोजन केले जाते. लाखांदूर तालुक्याला २५० क्युसेक पाण्याची गरज असताना केवळ १३५ क्युसेक पाण्याचा पुरवठा केला जातो. गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५० क्युसेक पाण्याची गरज असताना ६५० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो. बारव्हा शाखेंतर्गत २,७०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. वडसा व आरमोरी शाखेअंतर्गत आठ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतो. मुख्य नहरातून दोन्ही जिल्ह्याला पाणी वाटप होते. वडसा येथील उपविभागीय अभियंते व शाखा अभियंता हे लाखांदूर तालुक्यातील शेतकरी व अभियंत्यांना विश्वासात न घेता, नहराचे दरवाजे उघडणे व बंद करीत असल्यामुळे लाखांदूर तालुक्याला अत्यल्प पाणी मिळत होते. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे धानपीक करपू लागले आहे. त्यामुळे बारव्हा व लाखांदूर शाखेअंतर्गत पाणी वापर संस्था असताना शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य नहरावर हल्लाबोल करीत अभियंत्याला पकडले. शेतकऱ्यांशी चर्चा न करता परतल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील शाखा अभियंता वाहुले यांना निवेदन सादर करुन त्यांच्या उपस्थितीत नहराचे दरवाजे उघडले. पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा आरोप करुन यापुढे नियमित पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेच्या अध्यक्षांनी दिला. यावेळी दादाजी डांगे रा.जैतपूर, रमेश पारधी रा.लाखांदूर, श्रावण मैंद रा.जैतपूर, डोमा कुळमते रा.मानेगाव, सुका लंजे रा.दांडेगाव, दिलीप वासनिक रा.चप्राड, इसन देशमुख रा.चप्राड, अंताराम हजारे, प्रभाकर राऊत, धनराज ढोरे यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)नियोजनशून्य कारभाराचा फटकाइटियाडोह पाटबंधारे विभांतर्गत पाण्याचा विसर्ग १३०० क्युसेक मीटर व्हावा, यासाठी शासनाचे १०० कोटी खर्च करुन अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली. परंतु, पाण्याचा विसर्ग ११०० क्युसेक मीटर आहे. १० कोटींचा निधी माती व मुरुम कामासाठी खर्च करण्यात आला. कृषीपंपाना नियम धाब्यावर बसवून पाणी देण्यात येते. यात अभियंत्याचा नियोजन शुन्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप नामदेव सोरते यांनी केला. अभियंत्यावर गुन्हे दाखल करावडसा व आरमोरी येथील शाखा अभियंता हे मुख्य कालव्याचे गेट संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता किंवा पाणी वापर संस्थाना विचारात न घेता नियमाची पायमल्ली करीत. जास्तीत जास्त पाणी कॅनलचे गेट उघडे करुन व लाखांदूर शाखेतील गेट बंद करुन चोरुन नेत असल्याचा आरोप करीत आठही संस्था अध्यक्षांनी वडसा येथील शाखा अभियंता टी. के. मेंढे व उपविभागीय अभियंता गोहाटे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.