शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

‘गीतांजली’चा सहवास हिरावणार

By admin | Updated: June 3, 2014 23:52 IST

गीतांजलीच्या देखण्या व गतिमान सौंदर्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरु आहे. ती अनेक वर्षापासून राणी म्हणून ओळखल्या जाते. यामुळे महिला पुरुष यांच्यासह ती सर्वांच्या आकर्षणाचा भाग बनली होती.

वरठी : गीतांजलीच्या देखण्या व गतिमान सौंदर्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरु आहे. ती अनेक वर्षापासून राणी म्हणून ओळखल्या जाते. यामुळे महिला पुरुष यांच्यासह ती सर्वांच्या आकर्षणाचा भाग बनली होती. तिच्या धावण्याच्या गतीमान पद्धतीमुळे ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. गीतांजलीसोबत आपण प्रवास करावा व दूरपर्यंत क्षणात मजल मारावी म्हणून चार दशकापासून प्रयत्न सुरु होते. अनेक वर्षांपासून असलेली प्रतिक्षा मागच्या वर्षी संपली व ती भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला येऊ लागली. पण तिला अपेक्षित प्रेक्षक व प्रवासी न मिळाल्यामुळे लवकरच ती भंडारा जिल्ह्याच्या सहवासापासून दूर जाणार असून तिच्या पाठोपाठ समताही येणार नाही.एकंदरीत १ जुलैपासून गीतांजली व समता या दोन्ही रेल्वे गाड्यांचा थांबा भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून बंद होणार आहे. मुंबई हावडा मार्गावर धावणार्‍या अतिजलद रेल्वे प्रवासी गाड्यांपैकी सर्वात जुनी रेल्वेगाडी म्हणून गीतांजली एक्स्प्रेसचे नाव आहे. भंडारा जिल्ह्यात सुरुवातीपासून धावणार्‍या शेकडो गाड्या आहेत. पण सर्वांना सहज लक्षात असलेले व आकर्षण असलेली एकमेव नाव येते ते म्हणजे गीतांजलीचे. थांबा नसलेल्या गावावरून भुर्रकन निघून जाणे व प्रवाशांना पटकन त्यांच्या ठिकाणावर पोहचविण्याच्या तिच्या सवयीमुळे प्रवाशांना या गाडीचे विशेष आकर्षण होते. गोंदियापासून ते अकोलापर्यंत नियमीत प्रवास करणारे व विविध शासकीय कामानिमित्त जाणार्‍याकरिता व विद्यार्थ्यांंकरिता अत्यंत सोयीची गाडी होती.चार दशकांपासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सदर गाडीचा थांबा देण्याची मागणी सुरु होती. याकरिता शेकडो निवेदन व अनेक संघटनांनी पुढाकार घेतला होता. पण ही गाडी भंडारा रोड रेल्वेस्थानकावर थांबविण्याची ताकद उभी झाली नाही. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने गतवर्षी या गाडीचा थांबा भंडारा रोड रेल्वे स्थानकावर मिळाला. या करिता प्रफुल पटेल यांना आपले वजन वापरले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरु झालेली गाडी लवकरच बंद होणार असल्याचे पत्र स्थानिक रेल्वे विभागाला मिळाले आहे. गीतांजलीपाठोपाठ आता समता एक्स्प्रेसही १ जुलैपासून बंद होणार आहे. थांबा बंद करण्यासाठी रेल्वे विभागाकडून ठोस असे कारण दिलेले नाही. पण हावडापासून सुसाट वेगाने धडधड धावणारी गीतांजली वर एक वर्षापूर्वी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर लागणारे ब्रेक आता १ जुलैपासून लागणार नाहीत. गीतांजली पुन्हा नेहमीप्रमाणे भुर्रकन जिल्हावासीयांची चेष्टा करून निघून जाईल. याबरोबर अनेक वर्षापासून विशाखापट्टणम् ते हजरत निजाउद्दीन मार्गावर धावणारी समता एक्स्प्रेसही बंद होणार आहे. दिल्लीला जाणारी ही एकमेव गाडी आठवड्यातून पाच दिवस धावत होती.गीतांजली व समता एक्स्प्रेस या प्रवासी गाड्या बंद होणार असल्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. (वार्ताहर)