शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

हागणदारीमुक्तीसाठी रासेयो सेवकांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:02 IST

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने ग्रामस्तरावर सामाजिक बांधिलकीचे विविध कार्य पार पाडल्या जातात.

ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : अकरा महाविद्यालयांवर सोपविणार जबाबदारी

आॅनलाईन लोकमतभंडारा : राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने ग्रामस्तरावर सामाजिक बांधिलकीचे विविध कार्य पार पाडल्या जातात. त्यांचे कार्य व्याख्यानाजोगे असून आता रासेयो विदयार्थ्यांनी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात सहभाग घेवून सामाजिक दायत्विाने स्वच्छतेच्या कायार्ने गावांना नंदनवन करण्यासाठी हागणदारीच्या जागा स्वच्छ व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात पार पडलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शहा, अजय गजापूरे, दिपक बोडखे, व जिल्ह्यातील अकरा महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक यांची उपस्थिती होती.जिल्ह्याची हागणदारीमुक्त प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून स्वच्छतेच्या कार्याला चालना देण्यासाठी अनेक ग्राम पंचायतीमध्ये गावातील हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. स्वच्छतेबरोबरच आता प्लॉस्टीक बंदीची मोहिम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात ही मोहीम अधिक गतीशिल व्हावी, याकरिता आता रासेयो विभागांचा सहभाग घ्यायचा आहे. त्या उद्देश्याने भंडारा येथील जे.एम.पटेल महाविद्याल व आठवले महाविद्यालय यांचेसह जिल्ह्यातील अकरा महाविद्यालयाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात बोलविण्यात आली होती.प्रत्येक महाविदयालयांनी या करिता ३ गावे दत्तक घ्यावीत. त्या गावांमध्ये हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी दिवसभर श्रमदान, स्वच्छता रॅली, पथनाटयांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून जनजागृती करावी व भंडारा जिल्हयाला राज्यात दिशादर्शक ठरण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शाळा व अंगणवाडी स्तरावर स्वच्छतेचे महत्व सांगून धडे देणे, प्लॉस्टीक बंदीसाठी वातावरण तयार करणे याकरिता कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यावर भर देणे, पावसाळयात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणे यासह गावांना स्वच्छ व सुंदर करण्यासाठी विविध उपक्रम या माध्यमातून राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांनी आवाहन केले.नागरिकांचे जिवनमान उंचावण्यासाठी, पर्यावरणाचे संवर्धनासाठी, निरोगी आरोग्यासाठी व विविध पैलूंनी महत्वाचा व नाविण्यपूर्ण, नागरिकांच्या हिताचे कार्य भंडारा जिल्हयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक गतिशील करण्यासाठी रासेयो विभागाचे जिल्हयातील अकरा महाविदयालयाचे कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग देण्याचे अभिवचन दिले. यावेळी कार्यक्रम अधिकारी राजेंद्र शहा, आठवले समाजकार्य महाविदयालयाचे डॉ. नरेश कोलते, निर्धनराव पाटील महाविदयालयाचे लाखनी यू.पी. शहारे, संताजी महाविदयालय पालांदूर संजयकुमार निंबेकर, श्यामरावबापू कापगते महावियालय साकोली प्रा. गणेश पाथोडे, कला वाणिज्य महाविदयालय पेट्रोल पंप जवाहरनगर विजय गणवीर, साई कला वाणिज्य महाविदयालय तूमसर संदीप चामट, समर्थ महाविदयालय लाखनीचे श्री धनंजय गि-हेपूंजे, निर्धनराव पाटील वाघाये महाविदयालय एकोडीचे डॉ. सोपान बोंडे, कला वाणिज्य महाविदयालय करडीचे निलकंठ सोनेकर यांची उपस्थिती होती.