शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

अतिक्रमण न काढता केले रस्त्याचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनासमोरपर्यंत (कालवा रोड)च्या रस्त्यावरील अतिक्रमण न काढता रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. परिणामी हा रोड आधीच अतिक्रमणाने व्यापलेला असताना डांबरीकरणानंतर अतिक्रमणधारकांचे चांगभल करण्याचा हा प्रकार आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.सामाजिक न्याय भवन ते राजीव गांधी चौकापर्यंतचा रस्ता तसा वर्दळीचा समजला जातो. सिमेंट रस्त्यावरून न जाता शॉटकट मार्ग म्हणूनही अनेक जण या रस्त्याला पसंती देतात. आता तर या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने रहदारी अधिकच वाढली आहे. मात्र, या रोडलगत काहींनी घरांचे बांधकाम व कंपाऊंड रस्त्यापर्यंत केले आहे. आधी ही जागा नहराची असल्याने जागा मोठी होती. आता बांधकाम झाल्याने हा मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चार दिवसांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा व नंतरच डांबरीकरणाचे बांधकाम करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले होते. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या निवेदनात परिसरातील जवळपास ७५ कुटुंब प्रमुखांनी स्वाक्षरीसह निवेदन प्रशासनाला दिले होते. भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.आता या मार्गावर प्रचंड रहदारी असून रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर नामवंत दवाखानेसुद्धा आहेत. याशिवाय सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळही मोठी असते. परिणामी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा, अशी मुख्य मागणी आहे. आता तर अतिक्रमण न काढताच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत.

वर्दळीचा मार्गशहरातील अनेक मार्ग वर्दळीचे आहेत. त्यापैकी राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनाकडे निघणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. आता या वर्दळीचा रस्त्यावरील अतिक्रमण न काढता डांबरीकरण झाल्याने वर्दळ वाढली आहे. आधी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने नागरिक येथून रहदारी करणे टाळायचे. मात्र सद्यस्थितीत डांबरीकरण रस्त्याने जाण्यासाठी अनेक जण या रस्त्याचा उपयोग करीत आहेत.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण