शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण न काढता केले रस्त्याचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनासमोरपर्यंत (कालवा रोड)च्या रस्त्यावरील अतिक्रमण न काढता रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. परिणामी हा रोड आधीच अतिक्रमणाने व्यापलेला असताना डांबरीकरणानंतर अतिक्रमणधारकांचे चांगभल करण्याचा हा प्रकार आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.सामाजिक न्याय भवन ते राजीव गांधी चौकापर्यंतचा रस्ता तसा वर्दळीचा समजला जातो. सिमेंट रस्त्यावरून न जाता शॉटकट मार्ग म्हणूनही अनेक जण या रस्त्याला पसंती देतात. आता तर या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने रहदारी अधिकच वाढली आहे. मात्र, या रोडलगत काहींनी घरांचे बांधकाम व कंपाऊंड रस्त्यापर्यंत केले आहे. आधी ही जागा नहराची असल्याने जागा मोठी होती. आता बांधकाम झाल्याने हा मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चार दिवसांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा व नंतरच डांबरीकरणाचे बांधकाम करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले होते. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या निवेदनात परिसरातील जवळपास ७५ कुटुंब प्रमुखांनी स्वाक्षरीसह निवेदन प्रशासनाला दिले होते. भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.आता या मार्गावर प्रचंड रहदारी असून रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर नामवंत दवाखानेसुद्धा आहेत. याशिवाय सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळही मोठी असते. परिणामी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा, अशी मुख्य मागणी आहे. आता तर अतिक्रमण न काढताच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत.

वर्दळीचा मार्गशहरातील अनेक मार्ग वर्दळीचे आहेत. त्यापैकी राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनाकडे निघणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. आता या वर्दळीचा रस्त्यावरील अतिक्रमण न काढता डांबरीकरण झाल्याने वर्दळ वाढली आहे. आधी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने नागरिक येथून रहदारी करणे टाळायचे. मात्र सद्यस्थितीत डांबरीकरण रस्त्याने जाण्यासाठी अनेक जण या रस्त्याचा उपयोग करीत आहेत.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण