शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

अतिक्रमण न काढता केले रस्त्याचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनासमोरपर्यंत (कालवा रोड)च्या रस्त्यावरील अतिक्रमण न काढता रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. परिणामी हा रोड आधीच अतिक्रमणाने व्यापलेला असताना डांबरीकरणानंतर अतिक्रमणधारकांचे चांगभल करण्याचा हा प्रकार आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.सामाजिक न्याय भवन ते राजीव गांधी चौकापर्यंतचा रस्ता तसा वर्दळीचा समजला जातो. सिमेंट रस्त्यावरून न जाता शॉटकट मार्ग म्हणूनही अनेक जण या रस्त्याला पसंती देतात. आता तर या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने रहदारी अधिकच वाढली आहे. मात्र, या रोडलगत काहींनी घरांचे बांधकाम व कंपाऊंड रस्त्यापर्यंत केले आहे. आधी ही जागा नहराची असल्याने जागा मोठी होती. आता बांधकाम झाल्याने हा मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चार दिवसांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा व नंतरच डांबरीकरणाचे बांधकाम करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले होते. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या निवेदनात परिसरातील जवळपास ७५ कुटुंब प्रमुखांनी स्वाक्षरीसह निवेदन प्रशासनाला दिले होते. भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.आता या मार्गावर प्रचंड रहदारी असून रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर नामवंत दवाखानेसुद्धा आहेत. याशिवाय सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळही मोठी असते. परिणामी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा, अशी मुख्य मागणी आहे. आता तर अतिक्रमण न काढताच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत.

वर्दळीचा मार्गशहरातील अनेक मार्ग वर्दळीचे आहेत. त्यापैकी राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनाकडे निघणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. आता या वर्दळीचा रस्त्यावरील अतिक्रमण न काढता डांबरीकरण झाल्याने वर्दळ वाढली आहे. आधी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने नागरिक येथून रहदारी करणे टाळायचे. मात्र सद्यस्थितीत डांबरीकरण रस्त्याने जाण्यासाठी अनेक जण या रस्त्याचा उपयोग करीत आहेत.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण