शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

आसगाी-निघवी डांबरीकरणाचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:53 IST

०४ लोक १५ के चिचाळ : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पवनी तालुक्यातील आसगांव निघवी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत ...

०४ लोक १५ के

चिचाळ : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पवनी तालुक्यातील आसगांव निघवी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. नियमांना डावलून थातूरमातूर पद्धतीने रस्ता डांबरीकरणाचे काम होत असल्यामुळे या निकृष्ट दर्जाचा रस्ता किती काळ तग धरणार अशी तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

पवनी तालुक्यातील आसगाव निघवी या तीन कि.मी. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गोंदिया येथील एका कंत्राटदारामार्फत होत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने होत असलेल्या लाखो रुपयांच्या कामावर देखभालीकरिता प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थिती दर्शवीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अंदाजपत्रकानुसार काम करण्यात येत नाही. रस्त्याचे डांबरीकरण करीत असताना रस्ता झाडून डांबर टाकणे व त्यावर गिट्टीचा थर अंथरणे, असे अंदाजपत्रकात नमूद असताना कंत्राटदाराने साधा रस्ता झाडण्याचे सौजन्य दाखविले नाही. डांबर टाकून रस्ता काम सुरुवात केली. कामात कमी गुणवत्तेच्या डांबरीकरणाचा थर वापरण्यात येत आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामाची चौकशी गुणवता नियंत्रण विभागामार्फत झाल्यानंतरच त्यांचे देयक अदा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या कामाची वेळीच चौकशी करण्याची मागणी ब्रम्ही येथील सामाजिक कार्यकर्ते विलास घावळे यांनी केली आहे.