शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पालांदुरात पाण्याची कृत्रिम टंचाई

By admin | Updated: June 10, 2014 23:52 IST

लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंद नदीच्या खोऱ्यातील सर्वात लहान मोठे गाव म्हणजे पालांदूर.पालांदुरला भूमिगत पाण्याची मुबलकता असूनही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे

पालांदूर : लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंद नदीच्या खोऱ्यातील सर्वात लहान मोठे गाव म्हणजे पालांदूर.पालांदुरला भूमिगत पाण्याची मुबलकता असूनही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. शासनाने पाच दहा नव्हे सव्वा कोटी रुपये देऊनही महिलांना पाण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे.गावाच्या विकासाकरिता ग्राम पंचायत अत्यंत महत्वाची बाब आहे. स्थानिक समस्यांना तात्काळ मुक्ती मिळण्याकरिता ग्रामपंचायत प्रभावी माध्यम लोकशाहीत प्रथम आहे. गावात चौफेर विकास भेदभाव विरहित साधण् याकरिता ग्रामसभा प्रभावी साधन माध्यम आहे. गावकरी ग्रामसभेत हिरहिरीने भाग नोंदवित पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामपंचायतला महत्वाच्या सूचना दिल्या. मात्र जबाबदारीची जाणीव हरविलेल्या ग्रामपंचायतने ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविली.पालांदूर गाव सुमारे पाच हजार लोकवस्तीचे आहे. दोन लक्ष लिटर पाण्याची साठवणूक क्षमता असलेले दोन जलकुंभ मिळणाऱ्या आठ तासाच्या विजेवर तुडूंब भरतात. प्रत्येक व्यक्तीला चाळीस लिटर पाणी याप्रमाणे प्रती कुटुंबाला ४०० लिटर पाणी मिळू शकते. मात्र पाणी वाटप यंत्रणेच्या हेकेखोर पणाने कुठे जास्त तर कुठे कमी तर कुठे थेंबही नाही अशी स्थिती पालांदूर नळयोजनेची झाली आहे.नळाला तोट्याच नाहीतपालांदूर नळयोजना एक ना अनेक कारणांनी वर्षभर गावात चर्चेत राहते. नळयोजना फसवी राहण्याकरिता नळाला तोट्याच नसणे हेही एक प्रमुख कारण आहे. नळाला तोट्या लावल्या पाहिजेत असा फर्मान ग्रामपंचायतने काढून तसा प्रयोग करणे अगत्याचे आहे. पण कृती नसल्याने नळधारकही बेडर झाली आहेत. शेजारच्या खुनारी गावात सरपंच हेमंत सेलोकर यांनी स्वत: पुढे येऊन नयाला परमनंट तोट्या लावल्या. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग टळून समान पाणी वाटपाला मदत झाली.नव्या नळयोजनेची गरज पाण्याची तीव्र टंचाईचा मुद्दा लोकमतने प्रामाणिकपणे समोर आपला प्रशासनानेही दखल घेत गावाला भेट देऊन सर्व्हे केला. अभियंता सतीश मारबते जि.प. भंडारा यांच्या अभ्यासानुसार ग्रामपंचायतने नवीन पाणी पुरवठा स्त्रोताकरिता मागणी करणे आवश्यक आहे. तहान लागण्यापूर्वी विहिर खोदणे आवश्यक आहे. आज पालांदूर गावात जर प्रामाणीक प्रयत्न झाले तर किमान पिण्याकरिता तरी पाणी मिळू शकते. मात्र याकरिता नळाला मिटर लावणे, व्हॉल्व दुरुस्त करणे, चढ उतारानुसार पाणी सोडणे, ग्रामसभेच्या सूचनांचे पालन करणे, जुन्या सव्वाकोटीचा हिशेब जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला सादर करणे, खोल खड्डे विझविणे आदी कामे केलीत तरच पालांदुरात पिण्याच्या पाण्याचे समान वाटप होऊ शकेल.ग्राम पंचायत पुढाकार का नाहीसमान पाणी वाटपाकरिता येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याकरिता ग्रामसभेचा आधार घेत कारवाई व्हायला पाहिजे. मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी कर्तव्याला न जागल्याने जनतेचा रोष पत्करला आहे. काही सदस्य खड्डे बुजविण्यावर ठाम आहेत तसा ठराव सुद्धा झाला आहे. पण कही सदस्य राजकीय दबावाखाली असल्याने मागे बोलतात पण पुढे होताना दिसत नाही. पालांदूर ग्रामपंचायत सदस्यांना स्वत:च्या प्रभागातील पाणी समस्यासुद्धा अवगत नाही. प्रभागात फिरकत सुद्धा नाही. एकंदरीत समान पाणी वाटपाकरिता ग्रामपंचायत पुढाकार का घेत नाही, हा प्रश्न गाववासीयांसाठी अनुत्तरीत आहे. (वार्ताहर)