शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दडी मारलेल्या पावसाचे आगमन, शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

पावसाळ्याचा सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याचे दिसून येते. गत दोन आठवड्यापासून तर पाऊस बेपत्ता झाला होता. प्रचंड ...

पावसाळ्याचा सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याचे दिसून येते. गत दोन आठवड्यापासून तर पाऊस बेपत्ता झाला होता. प्रचंड उकाड्याने धानपीक करपण्याच्या अवस्थेत आले होते. शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत होते. तर नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचे दिसून येत होते. अशा स्थितीत शनिवारी दुपारी आकाशात ढगांची गर्दी झाली. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. श्रावण सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला तर धानपिकाला जीवदान मिळाले.

पवनी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मात्र अद्यापही जोरदार पाऊस बरसला नाही. धान पिकासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

बॉक्स

प्रकल्पाची स्थिती चिंताजनक

जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस कोसळला नाही. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा निम्यापेक्षाही कमी आहे. केवळ गोसे प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. मात्र बावनथडीसह मध्यम आणि लघू प्रकल्पात जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पुरेसा पाऊस झाला नाही तर रब्बीत पाणी मिळणे कठीण होणार आहे.