शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वृक्ष लागवडीसह संगोपणाचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:15 IST

३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेला सहायक वनसरंक्षक आर. डी. चोपकर, तहसिलदार, अक्षय पोयाम, भंडाराच्या गटविकास अधिकारी नुतन सावंत, पवनीचे गटविकास अधिकारी तेलंग, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे, पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, पवनीचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. धोटे, भंडारा सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा चव्हाण, तसेच अशासकीय संस्था प्रतिनिधींमध्ये शाहीद खान, पंकज देशमुख व इतर प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वृक्षलागवड व संगोपण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असावा, यासंदर्भात शासन निर्णय ४ जुन २०१९ ला जारी करण्यात आला. त्यानुषंगाने भंडारा व पवनी तालुकास्तरावर आमदार रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती नेमण्यात आली. सदर समिती वृक्ष लागवड व संगोपण कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांना दिलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करणे, वृक्ष लागवडीची लॅड बॅक तयार करणे, उंच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, शासनाने ठरविलेल्या कालमर्यादेनुसार खड्डे तयार करणे, झाडांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहण्यासाठी उपाययोजना करणे आदींसाठी कार्य करणार आहे. त्यानुषंगाने समितीची सभा १३ जुनला पंचायत समिती सभागृह, भंडारा येथे घेण्यात आली.वातावरण, ऋतू आणि हवामान बदल यांची तीव्रता आणि दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत हरित महाराष्ट्र प्रकल्पांची अंमलबजाणी सन २०१६ पासून संपूर्ण राज्यात सुरु आहे. राज्यातील जैवविविधतेचे सरंक्षण, संवर्धनाबरोबरच पर्यावरणाची सुरक्षितता राखण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनपरिक्षेत्र व वृक्षाच्छादन असणे गरजेचे आहे. राज्याचे वनपरिक्षेत्र आणि वृक्ष आवरण सध्याच्या २० टक्केवरुन ३३ टक्केवर नेण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम सातत्यपुर्ण रितीने राबविणे गरजेचे आहे.सन २०१९ च्या पावसाळ्यातील ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्याकरीता ५३.९९ लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवून विभाग देण्यात आले आहे. याकरीता वनविभाग सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, इतर विभाग तसेच ग्रापंचायतींचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग आहे. वृक्षलागवड सोबतच त्यांचे संगोपण करण्याकरीता सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सदर