शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

वृक्ष लागवडीसह संगोपणाचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:15 IST

३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेला सहायक वनसरंक्षक आर. डी. चोपकर, तहसिलदार, अक्षय पोयाम, भंडाराच्या गटविकास अधिकारी नुतन सावंत, पवनीचे गटविकास अधिकारी तेलंग, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे, पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, पवनीचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. धोटे, भंडारा सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा चव्हाण, तसेच अशासकीय संस्था प्रतिनिधींमध्ये शाहीद खान, पंकज देशमुख व इतर प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वृक्षलागवड व संगोपण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असावा, यासंदर्भात शासन निर्णय ४ जुन २०१९ ला जारी करण्यात आला. त्यानुषंगाने भंडारा व पवनी तालुकास्तरावर आमदार रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती नेमण्यात आली. सदर समिती वृक्ष लागवड व संगोपण कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांना दिलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करणे, वृक्ष लागवडीची लॅड बॅक तयार करणे, उंच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, शासनाने ठरविलेल्या कालमर्यादेनुसार खड्डे तयार करणे, झाडांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहण्यासाठी उपाययोजना करणे आदींसाठी कार्य करणार आहे. त्यानुषंगाने समितीची सभा १३ जुनला पंचायत समिती सभागृह, भंडारा येथे घेण्यात आली.वातावरण, ऋतू आणि हवामान बदल यांची तीव्रता आणि दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत हरित महाराष्ट्र प्रकल्पांची अंमलबजाणी सन २०१६ पासून संपूर्ण राज्यात सुरु आहे. राज्यातील जैवविविधतेचे सरंक्षण, संवर्धनाबरोबरच पर्यावरणाची सुरक्षितता राखण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनपरिक्षेत्र व वृक्षाच्छादन असणे गरजेचे आहे. राज्याचे वनपरिक्षेत्र आणि वृक्ष आवरण सध्याच्या २० टक्केवरुन ३३ टक्केवर नेण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम सातत्यपुर्ण रितीने राबविणे गरजेचे आहे.सन २०१९ च्या पावसाळ्यातील ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्याकरीता ५३.९९ लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवून विभाग देण्यात आले आहे. याकरीता वनविभाग सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, इतर विभाग तसेच ग्रापंचायतींचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग आहे. वृक्षलागवड सोबतच त्यांचे संगोपण करण्याकरीता सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सदर