शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधित चार गावांची होणार क्षेत्र मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

जल, जंगल, जमीन, प्राणी यांचे संवर्धन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली असून यासाठी जंगलव्याप्त गावांचे क्षेत्र आवंटीत करण्यात ...

जल, जंगल, जमीन, प्राणी यांचे संवर्धन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली असून यासाठी जंगलव्याप्त गावांचे क्षेत्र आवंटीत करण्यात आले. उमरेड-कऱ्हांडला-पवनी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करताना उमरेड, कुही, भिवापूर व पवनी तालुक्याच्या जंगलाचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले. यात पवनी तालुक्यातील जवळपास बारा गावे बाधित झाली आहेत. यातील खापरी, परसोडी, जोगीखेडा हमेशा, चीचगाव या गावांचे पुनर्वसन होण्यासाठी मंजुरी मिळाल्याने बाधित क्षेत्राच्या मोजमापाची कारवाई तालुका व्याघ्र प्रकल्प प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. लवकरच जमीन व शेती मोजमापाचा अहवाल उपविभागीय अधिकारी महसूल भंडारा यांना सादर करण्यात येऊन मूल्यांकनाची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावर पार पाडण्यात येणार आहे. मंजूर मूल्यांकनानुसार लाभार्थ्यांना फायदा मिळणार असून त्यासाठी विक्रीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. क्षेत्र मोजण्यासाठी संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाई पूर्ण करण्यात आली असून डिसेंबरपर्यंत प्रकल्पग्रस्तांना फायदा मिळण्याचा आशावाद तालुका व्याघ्र प्रकल्प अधिकारी आर. एम. घाडगे यांनी व्यक्त केला आहे.

बॉक्स

‘त्या’ आठ गावांचे नोटिफिकेशन केव्हा?

उमरेड-करांडला-पवनी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती होऊन आज सात वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र पवनीच्या पश्चिम दिशेला असलेल्या पाऊणगाव, गायडोंगरी, कवडशी, आवळगाव, मुरुमगाव, चीचखेडा, धामणगाव, जोगीखेडा या आठ गावांच्या शेतजमिनी शासनाने अधिग्रहित केल्या नसल्याने येथील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. वाघाचा संचार असल्याने जमिनीचा हंगाम करू शकत नाही. एकंदरीत इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सदर गावे प्रकल्पग्रस्त गावांच्या यादीत येण्यासाठी लोकांनी आवाज उठविल्याने तत्कालीन शासनाने परिणय फुके पालकमंत्री असताना प्रयत्न चालविले होते. परिणामी प्रस्तुत गावांच्या नोटिफिकेशनची फाईल शासनाकडे पोहोचली आहे. सरकार बदलले आणि सदर फाईलकडे दुर्लक्ष असल्याने, अनाथासारखी स्थिती असताना फायलीचा वाली कुणी नाही का? असा प्रश्न जनतेत उपस्थित करण्यात येत असून, प्रस्तुत गावांच्या नोटिफिकेशनची कार्यवाही केव्हा? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

बॉक्स

स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन?

मागील शासनाच्या काळात पाऊणगाव, गायडोंगरी, कवडशी, आवळगाव, मुरुमगाव, चीचखेडा, धामणगाव, जोगीखेडा ही आठ गावे प्रकल्पग्रस्त घोषित व्हावीत म्हणून मंत्रालयापर्यंत नोटिफिकेशनसाठी मजल मारण्यात आली. सदर फाईल शासनदरबारी पडून असून तिला धक्का मारण्यासाठी कुणीही स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे येताना दिसत नाही. क्षेत्राला शासनातीलच आमदार म्हणून नरेंद्र भोंडेकर आहेत. महाराष्ट्र शासनाकडे सदर प्रस्ताव अडून असल्याने धक्का मारण्याची गरज असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आमदार भोंडेकरांनी प्रस्तुत गावांतील जनतेच्या व्यथा समजून घेऊन नोटिफिकेशन करवून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा असे न झाल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन आहेत का? असा संभ्रम जनतेत निर्माण होईल.