शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
4
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
5
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
6
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
7
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
8
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
9
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
10
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
11
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
12
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
13
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
14
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
15
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
16
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
17
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
18
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
19
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
20
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्द्रा’ बरसला; शेतकरी सुखावला

By admin | Updated: June 21, 2015 00:50 IST

आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला धानपिकाच्या पेरणीसाठी अपेक्षीत मृग बरसल्याने शेतकरी सुखावला.

जोमात पेरण्या सुरु : बळीराजाची निसर्गावर भिस्त, बियाणे खरेदीसाठी धावपळसासरा : आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला धानपिकाच्या पेरणीसाठी अपेक्षीत मृग बरसल्याने शेतकरी सुखावला. यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला जोमाने लागल्याचे दिसत आहे. रोहिणी नक्षत्राची सुरुवात २५ मे पासून झाली. रोहिणी नक्षत्रपासून एकूण नऊ नक्षत्रे पावसाची समजल्या जातात. यंदा रोहिणी नक्षत्र कोरडा गेला. ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. रोहिणी नक्षत्र बऱ्याच वेळा कोरडा जात असल्याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे. मृगात पाऊस पडतो, याची खात्री शेतकऱ्यांना असते. कित्येक वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन शेतकरी वर्ग मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावसाची अर्थात मृगसरींची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. यावर्षी शेतकऱ्यांना जवळपास नऊ दिवसापासून पावसाची प्रतीक्षा होती. सध्या मृग बरसला. प्रत्येक नक्षत्र १५ दिवसांचा माणल्या जातो. मृग नक्षत्राला आज १२ दिवस झाले. येत्या २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला प्रांरभ होत आहे. आर्द्रा नक्षत्राच्या पूर्व संध्येला मृग बरसला अन् शेतकरी वर्ग अंतर्मनातून सुखावला व पेरणीच्या कामाला लागला आहे. शेतकऱ्यांचे सुखावणे सदोदित टिकून राहिल का? या प्रश्नाचे उत्तर निसर्गालाच माहित आहे, यात शंकाच नाही.दरवर्षी शेतकरीवर्ग अस्मानी आणि सुल्तानी संकटाने जर्जर होतांना दिसतो. प्रत्येक वेळेला यंदा चांगला पाऊस पडेल. भरपूर उत्पन्न मिळेल. दु:ख दारिद्रय दूर होतील. कर्जाचा डोंगर ओसरेल, कुटूंबात सुख, शांती, समाधान लाभेल अशा आशेत शेतकरी वर्ग असतो. बऱ्याच वेळा अवर्षण आणि अतिवृष्टीला बळी पडण्याचा अनुभव त्यांना आला आहे. कित्येकवेळा पिकावरील रोगराईने हतबल झालेला शेतकरी वर्ग दिसला. यंदा तरी शेतीतून सुख शांती समाधान मिळेल का, या प्रश्नाने शेतकरी वर्ग धास्तावल्याचे दिसत आहे. सध्या तरी मृगाच्या बरसण्याने शेतकरी सुखावला आहे. महागडे बियाणे पेरुन भरघोष उत्पादनाची अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे. (वार्ताहर)पीक विमासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतभंडारा : अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये यावर्षीसुध्दा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना खरीप २०१५ साठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विमा करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै असून शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भोयर यांनी केले आहे.या योजनेत भात, उडीद, मूग, तुळ, सोयाबीन, कांदा, ऊस, आडसाली, ऊस पूर्व हंगामी, ऊस सुरु, ऊस पूर्वा आदी पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रासाठी नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधता येईल.