शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

‘आर्द्रा’ बरसला; शेतकरी सुखावला

By admin | Updated: June 21, 2015 00:50 IST

आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला धानपिकाच्या पेरणीसाठी अपेक्षीत मृग बरसल्याने शेतकरी सुखावला.

जोमात पेरण्या सुरु : बळीराजाची निसर्गावर भिस्त, बियाणे खरेदीसाठी धावपळसासरा : आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला धानपिकाच्या पेरणीसाठी अपेक्षीत मृग बरसल्याने शेतकरी सुखावला. यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला जोमाने लागल्याचे दिसत आहे. रोहिणी नक्षत्राची सुरुवात २५ मे पासून झाली. रोहिणी नक्षत्रपासून एकूण नऊ नक्षत्रे पावसाची समजल्या जातात. यंदा रोहिणी नक्षत्र कोरडा गेला. ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. रोहिणी नक्षत्र बऱ्याच वेळा कोरडा जात असल्याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे. मृगात पाऊस पडतो, याची खात्री शेतकऱ्यांना असते. कित्येक वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन शेतकरी वर्ग मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावसाची अर्थात मृगसरींची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. यावर्षी शेतकऱ्यांना जवळपास नऊ दिवसापासून पावसाची प्रतीक्षा होती. सध्या मृग बरसला. प्रत्येक नक्षत्र १५ दिवसांचा माणल्या जातो. मृग नक्षत्राला आज १२ दिवस झाले. येत्या २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला प्रांरभ होत आहे. आर्द्रा नक्षत्राच्या पूर्व संध्येला मृग बरसला अन् शेतकरी वर्ग अंतर्मनातून सुखावला व पेरणीच्या कामाला लागला आहे. शेतकऱ्यांचे सुखावणे सदोदित टिकून राहिल का? या प्रश्नाचे उत्तर निसर्गालाच माहित आहे, यात शंकाच नाही.दरवर्षी शेतकरीवर्ग अस्मानी आणि सुल्तानी संकटाने जर्जर होतांना दिसतो. प्रत्येक वेळेला यंदा चांगला पाऊस पडेल. भरपूर उत्पन्न मिळेल. दु:ख दारिद्रय दूर होतील. कर्जाचा डोंगर ओसरेल, कुटूंबात सुख, शांती, समाधान लाभेल अशा आशेत शेतकरी वर्ग असतो. बऱ्याच वेळा अवर्षण आणि अतिवृष्टीला बळी पडण्याचा अनुभव त्यांना आला आहे. कित्येकवेळा पिकावरील रोगराईने हतबल झालेला शेतकरी वर्ग दिसला. यंदा तरी शेतीतून सुख शांती समाधान मिळेल का, या प्रश्नाने शेतकरी वर्ग धास्तावल्याचे दिसत आहे. सध्या तरी मृगाच्या बरसण्याने शेतकरी सुखावला आहे. महागडे बियाणे पेरुन भरघोष उत्पादनाची अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहे. (वार्ताहर)पीक विमासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतभंडारा : अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये यावर्षीसुध्दा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना खरीप २०१५ साठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विमा करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै असून शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भोयर यांनी केले आहे.या योजनेत भात, उडीद, मूग, तुळ, सोयाबीन, कांदा, ऊस, आडसाली, ऊस पूर्व हंगामी, ऊस सुरु, ऊस पूर्वा आदी पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रासाठी नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधता येईल.