शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

शेतीसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजूर करा

By admin | Updated: December 16, 2015 00:43 IST

तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पासह लहान मोठे प्रकल्प आहेत.

राजेंद्र पटले यांची मागणी : जलाशयाची क्षमता वाढविण्यावर भरभंडारा : तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पासह लहान मोठे प्रकल्प आहेत. मात्र त्या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात होत नाही. परिणामी भंडारा जिल्ह्यातील ज्या गावांना प्रकल्पांतर्गत सिंचन मिळत नाही अशा गावांसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात यावे, अशी मागणी किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी केली आहे.बावनथडी प्रकल्प अजुनपर्यंत पुर्णत्वास आले नाही. मात्र या प्रकल्पामुळे लेंडेझरी, खापा, आलेसूर, लोंढा, लवादा, मंगरली, गोबरवाही, सितासावंगी, पवनारखारी, भोंडकी, धुडरी, खंडाळा, सौदेपुर व करडी क्षेत्रात बावनथडी सिंचन प्रकल्पाचा लाभ मिळण्याची शक्यता नाही. अशा गावांसाठी लिफ्ट सिंचन योजना तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. करडी हा क्षेत्र वैनगंगा नदीच्या काठावर आहे. त्यामुळे सदर प्रकल्प या परिसरात कार्यान्वीत करण्याची गरज आहे.याकरिता शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजेंद्र पटले यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे पत्र व्यवहारही केला. सोंड्याटोला लिफ्ट सिंचन योजनेमुळे चांदपूर जलाशयाची क्षमता वाढविण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अभियांत्रिकी स्तरावर अभ्यास करून लिफ्ट सिंचन प्रकल्प तयार करण्याची गरज आहे. सदर सिंचन प्रकल्प निर्माण झाल्यास तालुक्यासह अन्य क्षेत्रालाही या प्रकल्पाचा लाभ मिळू शकेल. शासनाने यासंदर्भात मागणी पुर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पटले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांच्या समस्येकडे कानाडोळा केल्यास त्या मी खपवून घेणार नाही, असा इशाराही पटले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)