शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सहा कोटींच्या १६ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा ...

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपवनसंरक्षक एस. एस. भलावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघमित्रा कोल्हे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजय देशमुख, वरिष्ठ भु वैज्ञानिक शिवाजी पदमने, उपअभियंता यांत्रिकी नितीन पाटील, उपअभियंता दिनेश देवगडे, सहायक भु वैज्ञानिक व्ही. एम. मंत्री, जीवन प्राधिकारणाचे उपअभियंता डी. यू. तुरकर उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे या बैठकीत प्रकाशन करण्यात आले.

बाॅक्स

या गावांत होणार योजना

भंडारा तालुक्यातील सालेहेटी २४ लाख ९८ हजार, सीतेपर २३ लाख ९८ हजार, लाखनी तालुक्यातील गोंदी २४ लाख २१ हजार, सानगाव १५ लाख ६५ हजार, सायगाव १६ लाख ८३ हजार, पवनी तालुक्यातील चन्नेवाडा २७ लाख ३० हजार, खैरी २६ लाख ८८ हजार, सुरेबोडी २० लाख ८९ हजार, कुर्झा २४ लाख ९८, लाखांदूर तालुक्यातील आसोला ६६ लाख ९ हजार, विरली बु. ६१लाख ७० हजार, मोहाडी तालुक्यातील खडकी ८७ लाख ६६ हजार, पांजरा बोथली ४१ लाख ७६ हजार, विहिरगाव ४६ लाख १२ हजार व तुमसर तालुक्यातील मेहेगाव ६० लाख ५५ हजार आणि पांजरा योजना ३० लाख ४७ हजार किमतीच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

बाक्स

७६३ गावांत प्रत्येक घरी नळ जोडणी प्रस्तावित

जिल्ह्यातील ७६३ गावात प्रत्येक घारी नळ जोडणी प्रस्तावित असून ३०२ गावात योजनेची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ५२ टक्के घरी नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित नळ तातडीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.