शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाची वनमंत्र्याकडून प्रशंसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 00:20 IST

राज्य शासनाने राबविलेल्या वन महोत्सव उपक्रमात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ....

वृक्ष संवर्धनासाठी बक्षीस योजना : विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचा अनोखा उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने राबविलेल्या वन महोत्सव उपक्रमात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या विद्यार्थी व शाळांना बक्षीस या अभिनव योजनेची दखल राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून या उपक्रमाला नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यादीत स्थान दिले आहे.शासनाच्या वतीने नुकताच राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवडीचा वन महोत्सव लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असतांना यावर्षी ५ कोटीच्या वर वृक्ष लागवड राज्यभरात करण्यात आली. या वनोत्सवात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतून शाळा व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची सुरवात लोकमान्य टिळक शाळेतून जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लावून केली. वृक्ष लागवडीच्या या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन झाड लावण्यासाठी देण्यात आले. विद्याथ्यार्नी ही झाड आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा परिसरात लावावी आणि त्याचे पुढील तीन वर्षे संगोपन करावे. या सोबतच झाडाच्या वाढीचा अहवाल नियमित शाळेत सादर करावा. या प्रक्रियेत मुलांना झाडाचा अभ्यास होईल व वृक्षाचा लळा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे वृक्ष संगोपन केले अशा विध्याथ्यार्ना बक्षीस देण्यात येईल. ज्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी वृक्ष संगोपन करतील, त्या शाळेला सुद्धा बक्षीस देण्यात येईल, असा हा उपक्रम आहे.प्रत्येक शाळा पातळीवर सर्वोत्कृष्ट संगोपनासाठी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विद्याथ्यार्ची निवड होणार आहे. लागवड केलेल्या वृक्षांची प्रत्येक महिन्याला घेर, उंची व सद्यस्थितीबाबत मोजमाप घेवून नोंद केली जाणार आहे. १० महिन्यानंतर वृक्षांच्या संगोपनाबाबत प्रतयेक शाळेत वर्गनिहाय व त्यानंतर शाळापातळीवर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा ५ ते ११ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे.प्रत्येक शाळेत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ५०० व ३०० रुपये रोख व प्रमाणपत्र दिले जाईल. तालुकास्तरावर प्रथम शाळेला १० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र तर जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या शाळेला २५ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्याच्या वनमंत्र्यांनी घेतली असून या उपक्रमाचा समावेश नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यादीत केला आहे. वन महोत्सवादरम्यान राज्यभरात राबविलेल्या वेगळ्या व हटके उपक्रमाची यादी वनविभाग तयार करणार आहे. या यादीत भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचा हा उपक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे.