शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चिंताग्रस्त शेतकऱ्याचा हृदयाघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:35 IST

अत्यल्प पाऊस आणि निसर्गाच्या अपकृपेमुळे धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले.

ठळक मुद्देरोहणा येथील घटना : कमी उत्पादनाचा घेतला धसका

आॅनलाईन लोकमतमोहाडी : अत्यल्प पाऊस आणि निसर्गाच्या अपकृपेमुळे धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत असलेल्या रोहणा येथील पतिराम डोमा रेहपाडे (६२) या शेतकऱ्याचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.यावर्षी पावसामुळे रोवणी उशिरा झाली. काही शेतकऱ्यांनी रोवणी हिंमतीने करुन घेतली. पण तुडतुडा या रोगाने धान पिकावर हल्ला केला. धानाची नासाडी झाली. धान उत्पादनावर फरक पडला. धानाचे उत्पादन अर्ध्यापेक्षा हाती येत आहे. अशातच शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. रोहणा येथील पतिराम रेहपाडे यांनी धानाची मळणी केली. मळणी केल्यानंतर धानाचे उत्पन्न कमी आल्याने त्यांना चिंता सतावू लागली. मळणी केलेले धानाचे पोते शेतावरच ठेवून ते घरी आले. घरी आल्यावर कुटुंबासोबत धानाचे उत्पन्न कमी आल्याची चर्चा सुरू होती. सुनेने सासरे व पतीला जेवण करण्यास ताट वाढले. जेवताजेवता धान उत्पादन कमी आल्याचे ते सांगत होते. आता धान रोवणीची मजूरी, निंदन व कापणीही मजुरी कशी द्यायची, मळणीची रक्कम, शेती कसण्यासाठी ५० हजार रूपयाचे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, यावर बोलत होते. अशातच चिंतेने भयग्रस्त झालेल्या पतीरामला छातीत दुखायला लागले. अर्धे जेवन सोडून ते बरे वाटत नसल्याचे मुलाला सांगितले. रात्रीचे ९.३० वाजले होते. नियतीच्या मनात काही औरच होते. दवाखान्यात नेतानाच पतिराम यांची प्राणज्योत मालवली. पतीरामच्या निधनाचे वृत्त रोहणा गावचे सरपंच नरेश ईश्वरकर यांना माहित झाले. त्यांनी या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला दिली. आज सकाळी तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला.पाच एकरात झाले केवळ २० पोते धानपाच एकर शेतीत किमान ५० पोते होणे अपेक्षित होते. परंतु २० पोते झाले. स्वत:ची तीन एकर शेती व भाड्याने २ एकर शेतीत रोवणे केले होते. रोहणा परिसरातील जमिनी १० वर्षापूर्वी बावनथडी प्रकल्पात गेल्या आहेत. त्या जमिनीचा मोबदला बºयाच शेतकºयांना मिळाला नाही. बावनथडी प्रकल्पाची कामे अपूर्ण असून बावनथडीचे पाणी रोहणा येथील शेतीला मिळत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.