शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

हा तर शेतकरी विरोधी निर्णय

By admin | Updated: November 16, 2016 00:38 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील जिल्हा सहकारी बँकेने ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारू नये, असा आदेश दिला..

प्रशांत पवार : जिल्हा बँकेला नोटा स्वीकारण्यापासून डावलले भंडारा : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील जिल्हा सहकारी बँकेने ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारू नये, असा आदेश दिला. भारतातील शेतकऱ्यांसाठी हा आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.जिल्हा सहकारी बँकांचे जाळे ग्रामीण भागात विखुरले आहे. भारतामध्ये ३७१ जिल्हा सहकारी बँका असून १४,०६० शाखांच्या माध्यमातून त्यांचा व्यवहार सुरु आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा सहकारी बँका मुख्यत: शेतकरी व शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेसाठी काम करतात. शेतकऱ्यांना आता धान्याचे पैसे येणे सुरु झाले आहे. त्यामुळे ५०० व १००० रूपयांच्या नोटा शेतकऱ्यांकडून स्वीकारू नये, असा आदेश काढल्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा करता येत नाही आणि बँकेकडून त्यांना नोटा बदलवूनही मिळत नाही. ज्या शेतकऱ्याकडे लग्नकार्य असेल त्यांनी आता कसे करावे. शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेशिवाय अन्यत्र खाते नाही. त्यांचेजवळ एटीएम किंवा डेबीट कार्ड नाहीत. त्यामुळे दररोजचा आर्थिक व्यवहार कसा करावा, अशा एक ना अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावणार आहेत.आतापर्यंत सतत तीन वर्षाच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याचे चित्र दिसत आहे. असे असताना ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करून आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जिल्हा बँकेवर निर्बंध घालून शेतकऱ्यांसाठी चिता रचण्याचे काम हे सरकार करीत आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकेत पुन्हा व्यवहार सुरु न केल्यास नागपूर येथील रिझर्व्ह बँकेसमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)