शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हा तर शेतकरी विरोधी निर्णय

By admin | Updated: November 16, 2016 00:38 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील जिल्हा सहकारी बँकेने ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारू नये, असा आदेश दिला..

प्रशांत पवार : जिल्हा बँकेला नोटा स्वीकारण्यापासून डावलले भंडारा : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील जिल्हा सहकारी बँकेने ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारू नये, असा आदेश दिला. भारतातील शेतकऱ्यांसाठी हा आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.जिल्हा सहकारी बँकांचे जाळे ग्रामीण भागात विखुरले आहे. भारतामध्ये ३७१ जिल्हा सहकारी बँका असून १४,०६० शाखांच्या माध्यमातून त्यांचा व्यवहार सुरु आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा सहकारी बँका मुख्यत: शेतकरी व शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेसाठी काम करतात. शेतकऱ्यांना आता धान्याचे पैसे येणे सुरु झाले आहे. त्यामुळे ५०० व १००० रूपयांच्या नोटा शेतकऱ्यांकडून स्वीकारू नये, असा आदेश काढल्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा करता येत नाही आणि बँकेकडून त्यांना नोटा बदलवूनही मिळत नाही. ज्या शेतकऱ्याकडे लग्नकार्य असेल त्यांनी आता कसे करावे. शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेशिवाय अन्यत्र खाते नाही. त्यांचेजवळ एटीएम किंवा डेबीट कार्ड नाहीत. त्यामुळे दररोजचा आर्थिक व्यवहार कसा करावा, अशा एक ना अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावणार आहेत.आतापर्यंत सतत तीन वर्षाच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याचे चित्र दिसत आहे. असे असताना ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करून आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जिल्हा बँकेवर निर्बंध घालून शेतकऱ्यांसाठी चिता रचण्याचे काम हे सरकार करीत आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकेत पुन्हा व्यवहार सुरु न केल्यास नागपूर येथील रिझर्व्ह बँकेसमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)