शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

वीज वितरण कार्यालयावर संतप्त ग्रामस्थांचा हल्लाबोल

By admin | Updated: October 11, 2014 22:58 IST

वाढत्या वीज भारनियमनामुळे अंतिम टप्प्यातील धानपिकांना वाचविण्यासाठी विहिरीचे पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सावरी आणि लाखांदूर येथील ग्रामस्थांनी वीज

उद्रेक भारनियमनाचा : सावरीत तोडफोड, लाखांदुरात आक्रोशजवाहरनगर/लाखांदूर : वाढत्या वीज भारनियमनामुळे अंतिम टप्प्यातील धानपिकांना वाचविण्यासाठी विहिरीचे पाणी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सावरी आणि लाखांदूर येथील ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल केला. सावरी येथे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारला विद्युत कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी अज्ञात नागरिकांविरूध्द जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.पेंच पाटबंधारे प्रकल्पांतर्गत खरबी (नाका) परिसरातील शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र कालव्यांची दैनावस्था, नहरात झुडपे वाढल्याने पाण्याचा पुरवठा होत नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे विहिरीवर व नाल्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी मोटारपंप लावण्यात येते मात्र सावरी, इंदिरानगर, राजेदहेगाव, खराडी, खरबी, परसोडी, नांदोरा या परिसरात आठ तास भारनियमनामुळे शेतीला पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. विद्युत विभाग व पाटबंधारे विभागाला सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी संतप्त नागरिकांनी सकाळी १० वाजता सावरी येथील विद्युत कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यावेळी शाखा अभियंता उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी टेबलावरील कागदपत्र खाली फेकून खुर्च्यांची व दर्शनी फलकाची तोडफोड केली. आसोला आणि आथली येथील शेतकऱ्यांचा हल्लाबोललाखांदूर : दिवसाचे भारनियमन व रात्रपाळीत केल्यामुळे वैतागलेल्या आसोला आणि आथली येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी रात्री लाखांदूर विद्युत कार्यालयावर हल्लाबोल केला. संपूर्ण चौरास भागात धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. कृषी पंपाचीही संख्या सर्वाधिक आहे. धानपीक अंतिम टप्प्यात असताना विद्युत विभागाने भारनियमन सुरू केले आहे. दिवसाचे भारनियमन करुन रात्री १२ वाजेनंतर केवळ सहा तास विद्युत पुरवठा पुरविण्याचा निर्णय घेतल्याने हातचे पीक जाणार म्हणून शेतकऱ्यांनी विद्युत विभागाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत कार्यालयावर हल्लाबोल केला. दिवसा कृषी पंपाचे भारनियमनाचे कारण सांगून बंद केला जातो. ऐन धान गर्भात असताना रात्री १२ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा केवळ सहा तासाकरिता सुरु केला जातो. पिकाला पाणी देण्यासाठी हा वेळ अत्यल्प असल्याने चौरास भागातील धानपिक धोक्यात आले आहे. आसोला व आथली येथील शेतकऱ्यांनी भारनियमनाला कंटाळून अधिकाऱ्यांना घेराव करण्यासाठी तयारी केली होती. कनिष्ठ अभियंता देवगडे व वरिष्ठ अभियंता राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, भारनियमन बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)